शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Social Trend | जगण्याचेच प्रश्न गंभीर असताना रंगाचा मुद्दाच निरर्थक!

By अतुल चिंचली | Updated: December 21, 2022 10:12 IST

देशात महागाई, रोजगार, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा असे अनेक प्रश्न असताना रंगाचा मुद्दा का समाजासमोर आणला जातोय, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे...

पुणे : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वादाला ताेंड फुटले. हिंदू संघटनांकडून भगव्या रंगाला तीव्र विरोध सुरू आहे. तर अभिनेते, अभिनेत्रींकडून या गाण्याचे समर्थन केले जात आहे. सामान्य माणसांनी मात्र हा मुद्दाच निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

जनतेच्या नावाखाली भलतेच लोक आवाज उठवू लागले आहेत. यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. देशात महागाई, रोजगार, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा असे अनेक प्रश्न असताना रंगाचा मुद्दा का समाजासमोर आणला जातोय, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप, हिंदू संघटना लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून असा खोडसाळपणा करत असल्याची टीकाही काहींनी केली आहे. पूर्वीच्या अनेक चित्रपटांत भगवे कपडे घातले आहेत. त्यावेळी राजकीय नेते आणि महंत झोपले होते का? असा प्रश्न उपस्थित करत माधुरी दीक्षितच्या धक धक करने लगा, या गाण्याचे उदाहरण दिले जात आहे.

खरेतर कपड्याच्या रंगावर बोलण्यापेक्षा नेते मंडळींनी कमी कपड्यावर बोलायला पाहिजे होते. कारण, कोणीही नेत्याची मुलगी हा ड्रेस घालून प्रचार सभेत येणार नाही. किंबहुना घालतही नाही; पण तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि काहीही घालू अशा बोंबा मारतात. देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून आपण या करोडपती बॉलीवूडच्या मागे लागत आहोत. ज्यांना बघायचेय ते बघणारच आहेत. तुमचे ऐकून कोणी चित्रपट बघायला जाणार नाही का? खरेच इतका वेळ असेल तर त्यांनी देशात होणाऱ्या महागाई, बेरोजगारीविरोधात आवाज उठवला पाहिजे.

निरर्थक मुद्दे उपस्थित करून तुम्ही लोकांचे मनोरंजन करत आहात, असेही काही जण म्हणाले. हिरो- हिरॉईन कोणत्याही धर्माचे असोत; पण चित्रपटातील अंगप्रदर्शन बंद झाले पाहिजे. रंगाचा आणि कपड्यांचा शोध विज्ञानाने संपूर्ण मानव जातीच्या सोईसाठी लावला आहे. त्यावर कोणीही हक्क सांगता कामा नये. उगाच अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे काहींनी सांगितले.

जेवढा वाद तेवढा लाभ

पठाण रिलीज होण्याअगोदर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बेशरम रंग या गाण्यातील बिकीनीच्या रंगावरून टीकाटिप्पणी होऊ लागली आहे. चित्रपटाबाबत आधीच एवढा वाद होणार असेल. तर हीच खरी चित्रपटाची कमाई आहे, असे काही नागरिकांनी सांगितले. जेवढा वाद तेवढा चित्रपट अधिक कमवणार असल्याची प्रतिक्रिया देखील काहींनी दिली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नागरिक बंदी घालायला जाणार नाहीत. भलतीच लोक जनतेच्या नावाखाली आवाज उठवतील. सामान्य माणूस व्यवस्थित तिकीट काढून चित्रपटाचा आनंद घेईल. त्यामुळे पठाण प्रदर्शित झाल्यावर अधिक कमवेल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDeepika Padukoneदीपिका पादुकोण