शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हक्कासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:30 IST

धोरणांच्या सक्षम अंमलबजावणसाठी दाखल केली जनहित याचिका

कोरोना मुळे अनाथ झालेल्या मुलांचा बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याचे आदेश न निघाल्याने अंमलबजावणीमध्ये गोंधळ होत आहेत. तसेच सरकार तर्फे फक्त कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा वेगळा विचार करण्याऐवजी वेगवेगळ्या कारणाने झालेल्या सर्वच अनाथांचा सर्वांगीण विचार केला जावा, अशा अनेक मागण्यांसाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या गायत्री पटवर्धन यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. 

या याचिकेमध्ये मांडलेल्या मागण्यानुसार "कोरोनामुळे पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या मुलांसाठी मदत जाहीर झाली. पण प्रत्यक्ष आदेश निघालेले नाहीयेत. त्याबरोबरच या मुलांचा सर्व्हेचे आकडे पण वेगवेगळे येत आहेत. आशा वर्कर, हेल्पलाईन, पोलीस, रुग्णालये याच्या सहकार्याने असे सर्व्हे होत आहेत. त्यातही या मुलांचं पालकत्व सरकार घेईल असं म्हणले जात आहे. याचाच अर्थ त्यांना बालगृहामध्ये ठेवले जाणार आहे, बालसंगोपन योजनांमध्ये सहभागी केले जाईल असे म्हणत आहेत. पण मुळात गेल्या दोन वर्षापासून बालगृहांचे अनुदान मिळाले नाहीये. बाल संगोपन योजनेतून मिळणारे अनुदानाची नियमितपणे नाही, 18 वर्षवरील अनाथांनाच्या बाजूने कुणी बोलतही नाही. इतर कारणाने आधीच प्रवेशित असलेल्या अनाथ व एकल पालक असलेल्या मुलांच्या बाबती सक्षमपणे व नियमितपणे आर्थिक सहकार्य करून योजना राबवल्या तर कोरोनामुळे होणारे जे अनाथ आहेत त्यांनाही संबंधित योजनांमध्ये अधिक चांगल्या प्रकाराने पुनर्वसन करता येईल.

 अनाथ मुलांबाबत लोकांना बरे वाटावेत म्हणून केवळ मदती जाहीर करून उपयोगाचे नाही. बाल हक्काच्या, अधिकारांच्या अनुषंगाने राज्यात असलेल्या एकूणच अनाथांसाठी आहे त्याच योजना सक्षमपणे राबविण्याल्या तर अनाथांचा सर्वार्थाने विकास होऊ शकेल. असे या याचिकेच्या माध्यमातून सुचवाण्यात आले आहे. या प्रयत्नात सगळ्या आधी बालसंगोपन योजनेचा, फोस्टर केअर योजनेचा, शिष्यवृत्ती आदी अनाथांसाठी असलेल्या अनेक योजनांचा पुनर्विचार होण्याची व ती अधिक सक्षमपणे अंमलबजावणी करण्यासाठी नीट विचार करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 

या बरोबरच बालसंगोपन योजनेचा माध्यमातून एकल पालकाला निधी दिला जातो .त्यात शिक्षण, अन्न आणि निवारा यासाठी दरमहा ११०० रुपये दिले जातात. शिष्यवृत्तीचा निधी, 18 वर्षावरील अनाथ मुलांना मिळणारा महिन्याला मिळणारा 2000 रुपये हा निधी मुलांच्या शिक्षण, अन्न, निवारा, आरोग्य आदींसाठी य पुरेसा आहे का याचा विचार व्हावा, अशी मागणी देखील या याचिकेमधून करण्यात आली आहे.

या याचिकेबाबत आपली भूमिका मांडताना सामाजिक कार्यकर्त्या गायत्री पटवर्धन म्हणाल्या " कोरोना मध्ये आधीच बालगृहाना मदतीचा ओघ कमी आहे.त्यात ही मुलं गेली तर बालगृह तग कशी धरणार? कोणत्याही कारणाने झालेल्या अनाथ मुलांचे प्रश्न सारखेच आहेत, त्यांची दुःख, अडचणीही सारख्याच आहेत मग कोरोनामध्ये अनाथ झालेली मुलांना वेगळ्या प्रकारात का धरले जात आहेत? अनाथ ही काही नव्याने आलेली संकल्पना नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच अनाथांचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. फॉस्टर केअर योजना कागदावरच राहिलेली आहे. त्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. "

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक