शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हक्कासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:30 IST

धोरणांच्या सक्षम अंमलबजावणसाठी दाखल केली जनहित याचिका

कोरोना मुळे अनाथ झालेल्या मुलांचा बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याचे आदेश न निघाल्याने अंमलबजावणीमध्ये गोंधळ होत आहेत. तसेच सरकार तर्फे फक्त कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा वेगळा विचार करण्याऐवजी वेगवेगळ्या कारणाने झालेल्या सर्वच अनाथांचा सर्वांगीण विचार केला जावा, अशा अनेक मागण्यांसाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या गायत्री पटवर्धन यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. 

या याचिकेमध्ये मांडलेल्या मागण्यानुसार "कोरोनामुळे पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या मुलांसाठी मदत जाहीर झाली. पण प्रत्यक्ष आदेश निघालेले नाहीयेत. त्याबरोबरच या मुलांचा सर्व्हेचे आकडे पण वेगवेगळे येत आहेत. आशा वर्कर, हेल्पलाईन, पोलीस, रुग्णालये याच्या सहकार्याने असे सर्व्हे होत आहेत. त्यातही या मुलांचं पालकत्व सरकार घेईल असं म्हणले जात आहे. याचाच अर्थ त्यांना बालगृहामध्ये ठेवले जाणार आहे, बालसंगोपन योजनांमध्ये सहभागी केले जाईल असे म्हणत आहेत. पण मुळात गेल्या दोन वर्षापासून बालगृहांचे अनुदान मिळाले नाहीये. बाल संगोपन योजनेतून मिळणारे अनुदानाची नियमितपणे नाही, 18 वर्षवरील अनाथांनाच्या बाजूने कुणी बोलतही नाही. इतर कारणाने आधीच प्रवेशित असलेल्या अनाथ व एकल पालक असलेल्या मुलांच्या बाबती सक्षमपणे व नियमितपणे आर्थिक सहकार्य करून योजना राबवल्या तर कोरोनामुळे होणारे जे अनाथ आहेत त्यांनाही संबंधित योजनांमध्ये अधिक चांगल्या प्रकाराने पुनर्वसन करता येईल.

 अनाथ मुलांबाबत लोकांना बरे वाटावेत म्हणून केवळ मदती जाहीर करून उपयोगाचे नाही. बाल हक्काच्या, अधिकारांच्या अनुषंगाने राज्यात असलेल्या एकूणच अनाथांसाठी आहे त्याच योजना सक्षमपणे राबविण्याल्या तर अनाथांचा सर्वार्थाने विकास होऊ शकेल. असे या याचिकेच्या माध्यमातून सुचवाण्यात आले आहे. या प्रयत्नात सगळ्या आधी बालसंगोपन योजनेचा, फोस्टर केअर योजनेचा, शिष्यवृत्ती आदी अनाथांसाठी असलेल्या अनेक योजनांचा पुनर्विचार होण्याची व ती अधिक सक्षमपणे अंमलबजावणी करण्यासाठी नीट विचार करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 

या बरोबरच बालसंगोपन योजनेचा माध्यमातून एकल पालकाला निधी दिला जातो .त्यात शिक्षण, अन्न आणि निवारा यासाठी दरमहा ११०० रुपये दिले जातात. शिष्यवृत्तीचा निधी, 18 वर्षावरील अनाथ मुलांना मिळणारा महिन्याला मिळणारा 2000 रुपये हा निधी मुलांच्या शिक्षण, अन्न, निवारा, आरोग्य आदींसाठी य पुरेसा आहे का याचा विचार व्हावा, अशी मागणी देखील या याचिकेमधून करण्यात आली आहे.

या याचिकेबाबत आपली भूमिका मांडताना सामाजिक कार्यकर्त्या गायत्री पटवर्धन म्हणाल्या " कोरोना मध्ये आधीच बालगृहाना मदतीचा ओघ कमी आहे.त्यात ही मुलं गेली तर बालगृह तग कशी धरणार? कोणत्याही कारणाने झालेल्या अनाथ मुलांचे प्रश्न सारखेच आहेत, त्यांची दुःख, अडचणीही सारख्याच आहेत मग कोरोनामध्ये अनाथ झालेली मुलांना वेगळ्या प्रकारात का धरले जात आहेत? अनाथ ही काही नव्याने आलेली संकल्पना नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच अनाथांचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. फॉस्टर केअर योजना कागदावरच राहिलेली आहे. त्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. "

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक