शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

...म्हणून राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले; गोऱ्हे यांची आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:42 IST

राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेचा अहवाल समोर आला आहे

पुणे: आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, हा त्या सरकारचा चुकलेला निर्णय होता. त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवर केली.

चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डाॅ. गोऱ्हे बोलत होत्या. राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेने दिला आहे. हा आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा परिणाम आहे का, असा प्रश्नावर विचारल्यानंतर गोऱ्हे यांनी त्या सरकारने चुकीचाच निर्णय घेतला होता, याच निर्णयाचा परिणाम आहे. त्यामुळेच जनतेने निवडणुकीमध्ये त्यांना नापास केल्याची टीका महाविकास आघाडीवर केली. तसेच असरच्या अहवालाचा विचारात घेऊन कार्य अहवाल तयार करण्याच्या सूचना आपण शालेय मंत्र्यांना करू, असेडी डाॅ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

सामाजिक हिंसाराचाराचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आजही महिलांवर अन्याय व अत्याचार सुरूच आहेत. स्त्री - पुरुष समानता येण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. असे असले तरी इतर क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी योग्य अंमलबजावणीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

संमेलनाविषयी त्या म्हणाल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे. हे संमेलन पुण्यात होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा. या संमेलनात विविध उपक्रमांसह चर्चासत्र, परिसंवादांचा समावेश आहे. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डाॅ. श्यामकांत देवरे, नियोजन समितीचे दीपक मराठे, चारुदत्त निमकर उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाEducationशिक्षणSchoolशाळा