शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

...म्हणून राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले; गोऱ्हे यांची आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:42 IST

राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेचा अहवाल समोर आला आहे

पुणे: आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, हा त्या सरकारचा चुकलेला निर्णय होता. त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवर केली.

चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डाॅ. गोऱ्हे बोलत होत्या. राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेने दिला आहे. हा आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा परिणाम आहे का, असा प्रश्नावर विचारल्यानंतर गोऱ्हे यांनी त्या सरकारने चुकीचाच निर्णय घेतला होता, याच निर्णयाचा परिणाम आहे. त्यामुळेच जनतेने निवडणुकीमध्ये त्यांना नापास केल्याची टीका महाविकास आघाडीवर केली. तसेच असरच्या अहवालाचा विचारात घेऊन कार्य अहवाल तयार करण्याच्या सूचना आपण शालेय मंत्र्यांना करू, असेडी डाॅ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

सामाजिक हिंसाराचाराचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आजही महिलांवर अन्याय व अत्याचार सुरूच आहेत. स्त्री - पुरुष समानता येण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. असे असले तरी इतर क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी योग्य अंमलबजावणीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

संमेलनाविषयी त्या म्हणाल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे. हे संमेलन पुण्यात होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा. या संमेलनात विविध उपक्रमांसह चर्चासत्र, परिसंवादांचा समावेश आहे. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डाॅ. श्यामकांत देवरे, नियोजन समितीचे दीपक मराठे, चारुदत्त निमकर उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाEducationशिक्षणSchoolशाळा