शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:13 IST

युवक दिवसाला १८० ते २०० किमी प्रवास करत असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू आणि नेपाळ असा 2034 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला

धनकवडी: नरवीर तानाजी मालुसरे सिंहगडावर स्वराज्य रक्षणासाठी धारातीर्थ पडले. परंतु आजही त्यांच्या पराक्रमाचा वारसा आजची तरुणाई तितक्याच श्रद्धेने जपते, याचा प्रत्यय नुकताच आला. पुण्याच्या युवकांनी सिंहगड ते नेपाळमधील पशुपतीनाथ ही तब्बल २०३४ किलोमीटर अंतराची मोहीम सायकलवरून केवळ ११ दिवसात फत्ते केली आणि नेपाळच्या पशुपती मंदिरात आपल्या पराक्रमाचा सिंहनाद केला.. गिर्यारोहक कृष्णा मरगळे, लोकेश नाईलकर आणि मयूर तांबे या तिघांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. 

धावत्या युगात इंधनावर चालणारी वाहने आणि होणारे वायुप्रदूषण यांमुळे शहरांचा जीव घुटमळत आहे. यामुळे ही मोहीम सायकलवरून पूर्ण करून पुण्यातील या तिघांनी मिळून पुण्यनगरीतील तरुणाई आणि समाजा समोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. 

या मोहिमेमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू नेपाळ हा असा एकूण 2034 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. हे युवक दिवसाला 180 ते 220 किलोमीटरवरचा प्रवास करत होते, जिथे रात्र होईल तिथे स्वतः तंबू लावून राहायचे आणि पहाट झाली की पुढच्या प्रवासाला निघायचे. मजल दर मजल करत पुढे जायचं... सायकल चालवून भूक लागली की, मोकळी जागा पाहून स्वतः च्या हाताना स्वयंपाक करायचा आणि जेवण करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची असा खडतर प्रवास त्यांनी अकरा दिवस केला. 

२०३४ किलोमीटर सायकल मोहीमेत वेग वेगळ्या ठिकाणी नवनवीन माणसं भेटली, अनोळखी प्रांतातले चांगले वाईट असंख्य अनुभवांची शिदोरी घेऊन तिघेही हि परत पुण्यात सुखरूप परतलो असे कृष्णा मरगळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

मला वाटतं सायकलिंग आयुष्याला एक नवा अर्थ देते व जीवनात निश्चयाचे बळ देते मग बरोबर सायकल असो वा नसो. सायकलप्रमाणे माणसाचे आयुष्य हे तोल साधणारे व सदैव क्रियाशील असते, हेच खरे. असं हि मरगळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीCyclingसायकलिंगNepalनेपाळHealthआरोग्यSocialसामाजिक