शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Shree kshetra Paramdham Math : श्री क्षेत्र परमधाम मठ: अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:39 IST

हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे, ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते.

पुणे :महाराष्ट्रभूमी, संतपरंपरेने पावन झालेली भूमी, आजही विविध अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देत आहे. याच परंपरेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला श्री क्षेत्र परमधाम मठ (तपोवन परिसर) हा अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे.प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज आणि प.पू. श्री महावतार बाबाजींच्या प्रेरणेने स्थापन२०१० साली पुणे-नाशिक महामार्गाजवळील आरुडेवाडी येथे श्री क्षेत्र परमधाम मठ स्थापन करण्यात आला. या मठाची स्थापना प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) आणि प.पू. श्री महावतार बाबाजी यांच्या प्रेरणेने झाली. हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे आणि ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते. अध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून या संतांच्या अवतार कार्याची ओळख सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मठाचा मुख्य उद्देश आहे.अध्यात्मासोबत सामाजिक कार्यश्री क्षेत्र परमधाम मठामध्ये केवळ अध्यात्मिक कार्याचाच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांचाही अवलंब केला जातो. या उपक्रमांमध्ये पुढील उद्दिष्टांचा समावेश आहे.• ध्यानमंदिर आणि गोशाळा स्थापन• नक्षत्र वाटिका निर्माण• आदिवासी जनांचे उत्थान आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे• स्थानिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण• वृद्धाश्रम आणि मोफत वैद्यकीय सुविधा• दुर्मिळ औषधी वृक्षांची लागवड आणि संवर्धन• जंगलातील जीवजंतू आणि गोमातेचे संरक्षणयाशिवाय समाजातील अंधश्रद्धा नष्ट करणे, तळागाळातील जनतेपर्यंत पारमार्थिक जाणीवा पोहोचवणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानधारणेला प्रोत्साहन देणे, यावरही मठाने भर दिला आहे.दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहनमठाच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी परमधाम महावतार बाबाजी सेवा फाउंडेशन समाजातील दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहन करीत आहे. आपल्या प्रियजनांच्या आठवणी जपण्यासाठी, त्यांनी एक वृक्ष लावावे आणि धरती मातेला सुंदर भेट देऊन निसर्ग संवर्धनासाठी योगदान द्यावे, असेही फाउंडेशनचे आवाहन आहे.धार्मिक अधिष्ठानातून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा संकल्पश्री क्षेत्र परमधाम मठाचा मुख्य उद्देश अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक जागृती घडवून आणणे आहे. यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि नैसर्गिक आरोग्याचे संवर्धन होईल. आपल्या संतपरंपरेने पावन झालेल्या महाराष्ट्रात असा अनोखा अध्यात्मिक मठ स्थापन झाल्याने, तो समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकcultureसांस्कृतिकHinduहिंदूcowगाय