शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

Shree kshetra Paramdham Math : श्री क्षेत्र परमधाम मठ: अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:39 IST

हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे, ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते.

पुणे :महाराष्ट्रभूमी, संतपरंपरेने पावन झालेली भूमी, आजही विविध अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देत आहे. याच परंपरेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला श्री क्षेत्र परमधाम मठ (तपोवन परिसर) हा अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे.प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज आणि प.पू. श्री महावतार बाबाजींच्या प्रेरणेने स्थापन२०१० साली पुणे-नाशिक महामार्गाजवळील आरुडेवाडी येथे श्री क्षेत्र परमधाम मठ स्थापन करण्यात आला. या मठाची स्थापना प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) आणि प.पू. श्री महावतार बाबाजी यांच्या प्रेरणेने झाली. हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे आणि ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते. अध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून या संतांच्या अवतार कार्याची ओळख सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मठाचा मुख्य उद्देश आहे.अध्यात्मासोबत सामाजिक कार्यश्री क्षेत्र परमधाम मठामध्ये केवळ अध्यात्मिक कार्याचाच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांचाही अवलंब केला जातो. या उपक्रमांमध्ये पुढील उद्दिष्टांचा समावेश आहे.• ध्यानमंदिर आणि गोशाळा स्थापन• नक्षत्र वाटिका निर्माण• आदिवासी जनांचे उत्थान आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे• स्थानिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण• वृद्धाश्रम आणि मोफत वैद्यकीय सुविधा• दुर्मिळ औषधी वृक्षांची लागवड आणि संवर्धन• जंगलातील जीवजंतू आणि गोमातेचे संरक्षणयाशिवाय समाजातील अंधश्रद्धा नष्ट करणे, तळागाळातील जनतेपर्यंत पारमार्थिक जाणीवा पोहोचवणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानधारणेला प्रोत्साहन देणे, यावरही मठाने भर दिला आहे.दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहनमठाच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी परमधाम महावतार बाबाजी सेवा फाउंडेशन समाजातील दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहन करीत आहे. आपल्या प्रियजनांच्या आठवणी जपण्यासाठी, त्यांनी एक वृक्ष लावावे आणि धरती मातेला सुंदर भेट देऊन निसर्ग संवर्धनासाठी योगदान द्यावे, असेही फाउंडेशनचे आवाहन आहे.धार्मिक अधिष्ठानातून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा संकल्पश्री क्षेत्र परमधाम मठाचा मुख्य उद्देश अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक जागृती घडवून आणणे आहे. यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि नैसर्गिक आरोग्याचे संवर्धन होईल. आपल्या संतपरंपरेने पावन झालेल्या महाराष्ट्रात असा अनोखा अध्यात्मिक मठ स्थापन झाल्याने, तो समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकcultureसांस्कृतिकHinduहिंदूcowगाय