शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 09:49 IST

‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’...

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ ते १० नेत्यांना या ना त्या पद्धतीने त्रास देण्यात आला आहे. यामागे सत्ताधाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची आम्हा लाेकांची तयारी नाही. काय असेल ती किंमत देऊ पण अपेक्षा पूर्ण करणार नाही, हे सूत्र त्यांना पसंत पडत नसल्याने या यातना सहन कराव्या लागत आहेत,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयाेजित कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याचा लाैकिक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वालाही त्रास दिला जाताे. सत्ताधारी या संस्थांचा गैरवापर करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा काेणी किती लढवायच्या याबाबत चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. तिन्ही पक्षांच्या दाेन सदस्यांनी साेबत बसून चर्चा करावी. काही अडचण आलीच, तर मी, उद्धव ठाकरे, साेनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आम्ही मिळून मार्ग काढू. माध्यमे याबाबत विपर्यास करीत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याबाबत प्रत्येकाची वेगळी मते असली, तरी त्याबाबत निर्णय झाला नसल्याचेही पवार म्हणाले.

‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’

परमबीर सिंग प्रकरणाबाबत पवार म्हणाले, ‘सिंग यांच्याविराेधात किती तक्रारी आहेत याची राज्य सरकारने माहिती काढावी. चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चुकीचे काम करणाऱ्यांच्या सल्ल्यांनी ज्यांचा संबंध नाही, अशा लाेकांना त्रास द्यायचे आताच्या सरकारचे सूत्र दिसत आहे.’

दंगलींमागे काेण? हे तपासण्याची वेळ

‘राज्यातील दंगलींमागे कोणत्या शक्ती आणि विचारधारा आहेत, हे पाहिले, तर ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे, त्यांचा याच्यात कितपत सहभाग आहे, हे तपासण्याची गरज नक्की आली आहे,’ असे पवार म्हणाले.

‘मलिकांची भूमिका याेग्य ठरली’

‘गैरप्रकारांबाबत नवाब मलिक हे माध्यमांसमाेर बाेलले. त्याची किंमत त्यांना माेजावी लागली. मलिकांनी ज्या लाेकांबद्दल भूमिका घेतली, त्यांच्यावर सीबीआयला कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागला, याचा अर्थ नवाब मलिक यांची भूमिका सत्यावर आधारित असल्याचे स्पष्ट होते,’ असे पवार म्हणाले.

नाेट बंद करून काय चमत्कार हाेणार?

‘लहरी माणसाने निर्णय घ्यावेत, असे निर्णय हल्ली घेतले जात आहेत. यापूर्वी नाेटाबंदीच्या निर्णयामुळे लाेकांचे खूप नुकसान झाले. नाेटा बदलून न दिल्याने पुणे तसेच जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांचे नुकसान झाले. नाेटाबंदी केल्याने चमत्कार घडेल, असे बाेलण्यात आले. मात्र, अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. व्यावसायिक, उद्याेजक उद्ध्वस्त झाले. आता परत दाेन हजारांची नाेट बंद करून सरकार काेणत्या चमत्काराची अपेक्षा करीत आहे,’ असा प्रश्न उपस्थित केला.

‘सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे’

‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, मला सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे. स्थिर आणि विकासाला प्राेत्साहन देणारे सरकार हवे आहे. जनतेने साथ आणि शक्ती दिली, तर त्यातून आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू. बंगळुरूला गेलाे हाेतो तेथे विविध पक्षांच्या विराेधी पक्षातील नेत्यांची भेट झाली. एकत्र येऊन पुढील धाेरण ठरविणार आहोत,’ असे ते म्हणाले.

राहुल गांधींची पाठराखण

राहुल गांधी यांनी काढलेली पदयात्रा आणि जनमानसातील परिणाम याचे उदाहरण कर्नाटक निवडणुकीत दिसून आले. लाेक राहुल, तसेच त्यांच्या विचारांना शक्ती देतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी