शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 09:49 IST

‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’...

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ ते १० नेत्यांना या ना त्या पद्धतीने त्रास देण्यात आला आहे. यामागे सत्ताधाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची आम्हा लाेकांची तयारी नाही. काय असेल ती किंमत देऊ पण अपेक्षा पूर्ण करणार नाही, हे सूत्र त्यांना पसंत पडत नसल्याने या यातना सहन कराव्या लागत आहेत,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयाेजित कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याचा लाैकिक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वालाही त्रास दिला जाताे. सत्ताधारी या संस्थांचा गैरवापर करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा काेणी किती लढवायच्या याबाबत चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. तिन्ही पक्षांच्या दाेन सदस्यांनी साेबत बसून चर्चा करावी. काही अडचण आलीच, तर मी, उद्धव ठाकरे, साेनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आम्ही मिळून मार्ग काढू. माध्यमे याबाबत विपर्यास करीत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याबाबत प्रत्येकाची वेगळी मते असली, तरी त्याबाबत निर्णय झाला नसल्याचेही पवार म्हणाले.

‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’

परमबीर सिंग प्रकरणाबाबत पवार म्हणाले, ‘सिंग यांच्याविराेधात किती तक्रारी आहेत याची राज्य सरकारने माहिती काढावी. चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चुकीचे काम करणाऱ्यांच्या सल्ल्यांनी ज्यांचा संबंध नाही, अशा लाेकांना त्रास द्यायचे आताच्या सरकारचे सूत्र दिसत आहे.’

दंगलींमागे काेण? हे तपासण्याची वेळ

‘राज्यातील दंगलींमागे कोणत्या शक्ती आणि विचारधारा आहेत, हे पाहिले, तर ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे, त्यांचा याच्यात कितपत सहभाग आहे, हे तपासण्याची गरज नक्की आली आहे,’ असे पवार म्हणाले.

‘मलिकांची भूमिका याेग्य ठरली’

‘गैरप्रकारांबाबत नवाब मलिक हे माध्यमांसमाेर बाेलले. त्याची किंमत त्यांना माेजावी लागली. मलिकांनी ज्या लाेकांबद्दल भूमिका घेतली, त्यांच्यावर सीबीआयला कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागला, याचा अर्थ नवाब मलिक यांची भूमिका सत्यावर आधारित असल्याचे स्पष्ट होते,’ असे पवार म्हणाले.

नाेट बंद करून काय चमत्कार हाेणार?

‘लहरी माणसाने निर्णय घ्यावेत, असे निर्णय हल्ली घेतले जात आहेत. यापूर्वी नाेटाबंदीच्या निर्णयामुळे लाेकांचे खूप नुकसान झाले. नाेटा बदलून न दिल्याने पुणे तसेच जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांचे नुकसान झाले. नाेटाबंदी केल्याने चमत्कार घडेल, असे बाेलण्यात आले. मात्र, अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. व्यावसायिक, उद्याेजक उद्ध्वस्त झाले. आता परत दाेन हजारांची नाेट बंद करून सरकार काेणत्या चमत्काराची अपेक्षा करीत आहे,’ असा प्रश्न उपस्थित केला.

‘सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे’

‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, मला सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे. स्थिर आणि विकासाला प्राेत्साहन देणारे सरकार हवे आहे. जनतेने साथ आणि शक्ती दिली, तर त्यातून आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू. बंगळुरूला गेलाे हाेतो तेथे विविध पक्षांच्या विराेधी पक्षातील नेत्यांची भेट झाली. एकत्र येऊन पुढील धाेरण ठरविणार आहोत,’ असे ते म्हणाले.

राहुल गांधींची पाठराखण

राहुल गांधी यांनी काढलेली पदयात्रा आणि जनमानसातील परिणाम याचे उदाहरण कर्नाटक निवडणुकीत दिसून आले. लाेक राहुल, तसेच त्यांच्या विचारांना शक्ती देतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी