शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जुन्या चालीरीतींच्या बदलासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:19 IST

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (१५० वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती...

सासवड (पुणे) : महात्मा फुले यांचा दृष्टिकोन दीडशे वर्षांपूर्वीही ठोस समाज परिवर्तनाचा होता. त्यातून कर्मकांड, थोतांड, धार्मिक अंधश्रद्धा यावर प्रहार करीत जुन्या चालीरीती बदलण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापला. एवढेच नाही, तर बांधकाम व्यवसायात त्यांनी अभियंत्याप्रमाणे कामे केली. तसेच समाज बांधणी करतानाही शेतकऱ्याने शेतीबोरबरच जोडधंदा करण्याचा ठोस उपाय समाजाला दिला. महामानवांच्या योगदानातून महाराष्ट्र घडला. त्यात महात्मा जोतीबा फुले यांचे नाव महाराष्ट्रात नव्हे. तर जगभरात त्यांच्या विचारातून पोहोचले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (१५० वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती. त्यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे होत्या. तर प्रमुख उपस्थितीत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ. बाबा आढाव, अभ्यासक प्रा. हरी नरके, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पवार, स्वागताध्यक्ष संभाजी झेंडे, निमंत्रक रावसाहेब पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, बाळासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ. बाबा आढाव यांना स्व. सदाशिव झेंडे ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आणि कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात विवाह व्यवस्थापन व्यावसाय चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे विवाहाच्या नावाखाली किती उधळपट्टी होते, हे लक्षात घेऊन विवाह साधेपणाने केले तर फुलेंचे विचार आचरणात आणल्यासारखे होईल. सत्यशोधक समाज विचार आम्हा पवार कुटुंबीयात पहिल्यापासूनच आहे. देशभरातील आताची परिस्थिती पाहता, दीडशे वर्षांनंतरही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची गरज समाजाला आहे, असे वाटते. त्यातूनच लोकशाही व माणुसकी टिकेल. स्त्री-पुरुष समानता येईल व हा विचार भक्कम होईल.

आमदार संजय जगताप म्हणाले, सत्यशोधक समाज चळवळीने त्यावेळी लोकशाही, समता, बंधुता, सुधारणा, प्रगती आदी भूमिका मांडली. तरीही अजूनही घरात मुलगा व मुलगी यांच्यात समानता पाळली जात नाही. दोघांना समान न्याय देता येईल, त्यावेळी तुम्ही सत्यशोधक चळवळ मानली, असे म्हणता येईल. विवाहाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान झाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नुसत्या मोदी किंवा पवार यांच्या भाषणाने समानता येणार नाही. प्रत्यक्ष कृती हवी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र