शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

जुन्या चालीरीतींच्या बदलासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:19 IST

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (१५० वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती...

सासवड (पुणे) : महात्मा फुले यांचा दृष्टिकोन दीडशे वर्षांपूर्वीही ठोस समाज परिवर्तनाचा होता. त्यातून कर्मकांड, थोतांड, धार्मिक अंधश्रद्धा यावर प्रहार करीत जुन्या चालीरीती बदलण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापला. एवढेच नाही, तर बांधकाम व्यवसायात त्यांनी अभियंत्याप्रमाणे कामे केली. तसेच समाज बांधणी करतानाही शेतकऱ्याने शेतीबोरबरच जोडधंदा करण्याचा ठोस उपाय समाजाला दिला. महामानवांच्या योगदानातून महाराष्ट्र घडला. त्यात महात्मा जोतीबा फुले यांचे नाव महाराष्ट्रात नव्हे. तर जगभरात त्यांच्या विचारातून पोहोचले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (१५० वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती. त्यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे होत्या. तर प्रमुख उपस्थितीत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ. बाबा आढाव, अभ्यासक प्रा. हरी नरके, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पवार, स्वागताध्यक्ष संभाजी झेंडे, निमंत्रक रावसाहेब पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, बाळासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ. बाबा आढाव यांना स्व. सदाशिव झेंडे ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आणि कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात विवाह व्यवस्थापन व्यावसाय चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे विवाहाच्या नावाखाली किती उधळपट्टी होते, हे लक्षात घेऊन विवाह साधेपणाने केले तर फुलेंचे विचार आचरणात आणल्यासारखे होईल. सत्यशोधक समाज विचार आम्हा पवार कुटुंबीयात पहिल्यापासूनच आहे. देशभरातील आताची परिस्थिती पाहता, दीडशे वर्षांनंतरही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची गरज समाजाला आहे, असे वाटते. त्यातूनच लोकशाही व माणुसकी टिकेल. स्त्री-पुरुष समानता येईल व हा विचार भक्कम होईल.

आमदार संजय जगताप म्हणाले, सत्यशोधक समाज चळवळीने त्यावेळी लोकशाही, समता, बंधुता, सुधारणा, प्रगती आदी भूमिका मांडली. तरीही अजूनही घरात मुलगा व मुलगी यांच्यात समानता पाळली जात नाही. दोघांना समान न्याय देता येईल, त्यावेळी तुम्ही सत्यशोधक चळवळ मानली, असे म्हणता येईल. विवाहाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान झाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नुसत्या मोदी किंवा पवार यांच्या भाषणाने समानता येणार नाही. प्रत्यक्ष कृती हवी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र