शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मुंडण करून ‘जलसंपदा’चा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:01 AM

पाणी सोडण्याची मागणी : कोरड्या तलावात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

भिगवण : पुणे शहरासह मावळ विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणासह सर्व धरणे भरली; मात्र इंदापूर तालुक्यातील तलाव अद्यापही कोरडेच असल्याने शेतीसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव कोरडे पडले आहेत. वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी करूनही तलावात पाणी सोडले जात नसल्याने बुधवारी (दि. २९) शेतकºयांनी तलावात बोंबाबोंब आंदोलन करून सरकार आणि जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणा देऊन मुंडण करून निषेध केला.

गेल्या ५ वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी हे तलाव कोरडेठाक पडले आहेत. मागील काळात पाऊस कमीझाल्याने दुष्काळ पडला होता. याही वर्षी या भागात पाऊस कमी झाला आहे; पण पुणे भागातील धरण साखळीत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पाऊस सुरू असताना या शासनाने नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवले. पण, हेच वाया जाणारे पाणी कॅनॉलद्वारेसोडून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव भरून घेतले असते, तर या भागातील सिद्धेश्वर निंबोडी, मदनवाडी, पिंपळे, शेटफळगढे, पोंधवडी, भादलवाडी, स्वामी चिंचोली, पारवडी या लहान खेड्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली नसती, अशी खंत या वेळी आंदोलक शेतकºयांनी व्यक्त केली.अनेक वेळा या भागातील नागरिकांनी या तिन्ही तलावांत पाणी सोडण्याची मागणी करूनही त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनी केला. या वेळी गणपत ढवळे, गणेश साळुंके, सूरज बंडगर, आबासाहेब बंडगर, राजेंद्र धुमाळ, बबलू भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील तलाव प्रत्येक पाळीला भरून घेतले जात असताना आकसापोटी इंदापूर तालुक्यातील काही तलाव, ज्यावर राजकीय नेत्यांची शेती सिंचनाखाली नाही, ते जाणूनबुजून पाटबंधारे खात्याकडून कोरडे ठेवले जात आहेत. तर, आमदार आणि माजी मंत्री याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प