शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

बारामतीत भीषण दुष्काळाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:19 IST

टँकरच्या मागणीत होऊ लागली वाढ; रब्बीच्या आशा शेतकऱ्यांनी दिल्या सोडून

- रविकिरण सासवडे बारामती : बारामती तालुक्याच्या जिरायती भागामध्ये भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाबरोबर रब्बीच्यादेखील आशा शेतकºयांनी सोडून दिल्या आहेत. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.बारामतीचा जिरायती पट्टा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने या भागात पावसाचे प्रमाण अल्प असते. परतीच्या पावसाने साथ दिली तरच जिरायती भागातील शेती व अर्थकारण सुरळीत राहते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मि.मी. पावसाची नोंद आहे. अत्यल्प पावसामुळे जिरायती भागातील खरीप हंमाग पूर्णपणे वाया गेला. मोरगाव, तरडोली, मुर्टी, जोगवडी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव आदी भाग रब्बी हंगामातील मालदांडी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यंदाही या भागात पाऊस न पडल्याने खरिपातील पेरणी वाया गेली. तर, परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने रब्बीच्या आशादेखील मावळल्या. शेतीच्या पाण्यापेक्षा आता जिरायती भागाला पिण्याच्या पाण्याची चिंता लागून राहिली आहे.खडकवासला धरणातून जानाई-शिरसाई योजनेसाठी वरवंड व शिर्सुफळ येथील तलावात पाणी सोडण्याची मागणी जिरायती भागातील नेत्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी घेतलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत केली होती. तालुक्यातील काºहाटी, बाबुर्डी, माळवाडी, फोंडवाडा, देऊळगाव रसाळ, जळगाव क.प., जळगाव सुपे या गावांमध्ये लोकांना प्यायला पाणी नाही. सध्या खडकवासला कालव्याचे इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनामधूनच या दोन तलावांमध्ये पाणी सोडले, तर पुढील काही महिने जिरायती भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.तसेच, जिरायती भागातील ८० टक्के शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय जिरायती भागात मात्र शेतकºयांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. मात्र, जनावरांचा चारा महागला आहे. बागायती पट्ट्यातून येणाºया उसाला ३ हजार ५०० ते ४ हजार टन एवढा दर आला आहे. तर, मका आणि कडवळ यांचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. प्रतिगुंठा १ हजार २०० ते १ हजार ३०० असा दर आहे. शेतात काही पिकलेच नसल्याने जनावरांचा चारा विकत घ्यावा लागतो. मात्र, खिशात पैसे नसल्याने सर्वसामान्य शेतकºयांना चारा विकत घेणे परवडत नाही. परिणामी, जनावरांच्या कुपोषणाचाही धोका वाढत आहे. त्यामुळे जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिरायती भागातील सुपे, लोणी भापकर, उंडवडी या मंडळामध्ये भीषण चाराटंचाई जाणवू लागली आहे.दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या भागात पाणीटंचाई आहे, तेथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. चारा डेपोसाठी सध्या तरी मागणीचे प्रस्ताव किंवा निवेदन प्राप्त झालेले नाही. चाराटंचाईचीदेखील माहिती घेतलीजात आहे.- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती तालुकाजानाई-शिरसाईच्या पाण्यासाठी खडकवासल्याचे कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जर खडकवासल्याचे पाणी मिळाले, तर जिरायती भागाला मोठा दिलासा मिळेल.- संजय भोसले, सभापती, पंचायत समिती बारामतीतालुक्यात सध्या ६ टँकरच्या साह्याने पानसरेवाडी, काºहाटी, सोनवडी सुपे, मुर्टी, तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी आदी ६ गावे व ४७ वाड्यावस्त्यांतील १३ हजार ९४१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जळगाव सुपे, भिलारवाडी, काळखैरेवाडी, कारखेल आदी गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच गाडीखेल, वढाणे, बाबुर्डी यांचे टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.- प्रमोद काळे, गटविकास अधिकारी बारामती पंचायत समितीबारामती तालाुक्यात ८८ हजार २५३ मोठी जनावरे, तर १ लाख ५३ हजार ६९८ शेळ्या-मेंढ्या आहेत. या प्रमाणे २ लाख ४१ हजार ९५१ पशुधन बारामती तालुक्यामध्ये आहे. या पशुधनाला दिवसाला ७८३ मेट्रिक टन चारा व २० लाख ४३ हजार ३१० लिटर पाण्याची गरज आहे. जिरायती भागात जनावरांचे प्रमाण जास्त आहे. - डॉ. रमेश ओव्हाळ, तालुका पशुवैद्यकीय अधिकारीसध्या एकूण तालुक्यात ऊस वगळता ६० हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. आगामी काळात शेतकºयांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीBaramatiबारामती