शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भीषण दुष्काळाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:19 IST

टँकरच्या मागणीत होऊ लागली वाढ; रब्बीच्या आशा शेतकऱ्यांनी दिल्या सोडून

- रविकिरण सासवडे बारामती : बारामती तालुक्याच्या जिरायती भागामध्ये भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाबरोबर रब्बीच्यादेखील आशा शेतकºयांनी सोडून दिल्या आहेत. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.बारामतीचा जिरायती पट्टा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने या भागात पावसाचे प्रमाण अल्प असते. परतीच्या पावसाने साथ दिली तरच जिरायती भागातील शेती व अर्थकारण सुरळीत राहते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मि.मी. पावसाची नोंद आहे. अत्यल्प पावसामुळे जिरायती भागातील खरीप हंमाग पूर्णपणे वाया गेला. मोरगाव, तरडोली, मुर्टी, जोगवडी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव आदी भाग रब्बी हंगामातील मालदांडी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यंदाही या भागात पाऊस न पडल्याने खरिपातील पेरणी वाया गेली. तर, परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने रब्बीच्या आशादेखील मावळल्या. शेतीच्या पाण्यापेक्षा आता जिरायती भागाला पिण्याच्या पाण्याची चिंता लागून राहिली आहे.खडकवासला धरणातून जानाई-शिरसाई योजनेसाठी वरवंड व शिर्सुफळ येथील तलावात पाणी सोडण्याची मागणी जिरायती भागातील नेत्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी घेतलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत केली होती. तालुक्यातील काºहाटी, बाबुर्डी, माळवाडी, फोंडवाडा, देऊळगाव रसाळ, जळगाव क.प., जळगाव सुपे या गावांमध्ये लोकांना प्यायला पाणी नाही. सध्या खडकवासला कालव्याचे इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनामधूनच या दोन तलावांमध्ये पाणी सोडले, तर पुढील काही महिने जिरायती भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.तसेच, जिरायती भागातील ८० टक्के शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय जिरायती भागात मात्र शेतकºयांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. मात्र, जनावरांचा चारा महागला आहे. बागायती पट्ट्यातून येणाºया उसाला ३ हजार ५०० ते ४ हजार टन एवढा दर आला आहे. तर, मका आणि कडवळ यांचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. प्रतिगुंठा १ हजार २०० ते १ हजार ३०० असा दर आहे. शेतात काही पिकलेच नसल्याने जनावरांचा चारा विकत घ्यावा लागतो. मात्र, खिशात पैसे नसल्याने सर्वसामान्य शेतकºयांना चारा विकत घेणे परवडत नाही. परिणामी, जनावरांच्या कुपोषणाचाही धोका वाढत आहे. त्यामुळे जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिरायती भागातील सुपे, लोणी भापकर, उंडवडी या मंडळामध्ये भीषण चाराटंचाई जाणवू लागली आहे.दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या भागात पाणीटंचाई आहे, तेथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. चारा डेपोसाठी सध्या तरी मागणीचे प्रस्ताव किंवा निवेदन प्राप्त झालेले नाही. चाराटंचाईचीदेखील माहिती घेतलीजात आहे.- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती तालुकाजानाई-शिरसाईच्या पाण्यासाठी खडकवासल्याचे कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जर खडकवासल्याचे पाणी मिळाले, तर जिरायती भागाला मोठा दिलासा मिळेल.- संजय भोसले, सभापती, पंचायत समिती बारामतीतालुक्यात सध्या ६ टँकरच्या साह्याने पानसरेवाडी, काºहाटी, सोनवडी सुपे, मुर्टी, तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी आदी ६ गावे व ४७ वाड्यावस्त्यांतील १३ हजार ९४१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जळगाव सुपे, भिलारवाडी, काळखैरेवाडी, कारखेल आदी गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच गाडीखेल, वढाणे, बाबुर्डी यांचे टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.- प्रमोद काळे, गटविकास अधिकारी बारामती पंचायत समितीबारामती तालाुक्यात ८८ हजार २५३ मोठी जनावरे, तर १ लाख ५३ हजार ६९८ शेळ्या-मेंढ्या आहेत. या प्रमाणे २ लाख ४१ हजार ९५१ पशुधन बारामती तालुक्यामध्ये आहे. या पशुधनाला दिवसाला ७८३ मेट्रिक टन चारा व २० लाख ४३ हजार ३१० लिटर पाण्याची गरज आहे. जिरायती भागात जनावरांचे प्रमाण जास्त आहे. - डॉ. रमेश ओव्हाळ, तालुका पशुवैद्यकीय अधिकारीसध्या एकूण तालुक्यात ऊस वगळता ६० हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. आगामी काळात शेतकºयांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीBaramatiबारामती