शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

सात लाख पुणेकर वेठीस!

By admin | Updated: October 2, 2015 01:13 IST

पीएमपीला भाडेतत्त्वावर बससेवा पुरविणाऱ्या ५ ठेकेदारांनी आपल्या मागण्यांसाठी संचलनातील तब्बल ६५३ बस बंद ठेवल्याने गुरुवारी चाकरमानी पुणेकरांचे चांगलेच हाल झाले.

पुणे : पीएमपीला भाडेतत्त्वावर बससेवा पुरविणाऱ्या ५ ठेकेदारांनी आपल्या मागण्यांसाठी संचलनातील तब्बल ६५३ बस बंद ठेवल्याने गुरुवारी चाकरमानी पुणेकरांचे चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे, याची कोणतीही पूर्व कल्पना पीएमपीला न देताच दुपारनंतर ठेकेदारांनी ही वाहने अचानक बंद केल्याने, तब्बल ७ लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल पीएमपी प्रशासनाने घेतली असून, उद्या (शुक्रवारी) ठेकेदारांनी या बसेस रस्त्यावर न आणल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (मेस्मा) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत दिला.थकबाकी १४ कोटी कांगावा ६० कोटींचा या बस बंद करण्यापूर्वी काही तास आधी संबंधित पाच ठेकेदारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले; तसेच पीएमपीकडून करारातील अटींचा भंग करून, ठेकेदारांकडून दंड वसूल केला जात असल्याचा आरोप केला; मात्र ही पूर्णत: चुकीची बाब असल्याचे कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रांच्या आधारे निदर्शनास आणून दिले. या पाचही ठेकेदारांना १५ आॅगस्ट २०१५ पर्यंतची सर्व रक्कम देण्यात आली असून, त्यांची केवळ ३० सप्टेंबरपर्यंतची १४ कोटी रुपये थकबाकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले; तसेच पीपीपी तत्त्वावरील बसची रक्कम वजा केल्यास केवळ ९ कोटींचे ठेकेदारांचे देणे असल्याचा दावा कृष्णा यांनी केला आहे. या ठेकेदारांच्या बसेससाठी पार्किंग, ड्रायव्हर, दररोज सीएनजी; तसेच बसच्या स्वच्छतेचा तब्बल ४२ टक्के खर्च पीएमपी आधी करते; तसेच ही रक्कम नंतर बिलातून वजा केली जाते. त्यामुळे ठेकेदारांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. या शिवाय त्यांच्याकडून केली जाणारी दंड वसुली ही नियमानुसार असून, ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच हा दंड निश्चित केला जात असल्याची कागदपत्रेही कृष्णा यांनी सादर केली; तसेच त्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी आम्हाला कधीच त्याबाबत पत्रव्यवहार केला नाही; तसेच एवढी थकबाकी आहे, तर ती आधी का निदर्शनास आणून दिली नाही, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. सात लाख पुणेकर वेठीस! पीएमपीचे प्रामुख्याने नोकरदारवर्ग, शालेय विद्यार्थी; तसेच कष्टकरीवर्गाचे प्रवासी अधिक आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते आपल्या कामावर पोहोचले होते. त्यानंतर दुपारी ठेकेदारांनी बस बंद केल्याची कल्पना कोणासही नव्हती; मात्र सायंकाळी पाचनंतर शाळा आणि शासकीय कार्यालये; तसेच खासगी कार्यालयांची कामाची वेळ संपल्यानंतर, शहरातील सर्वच बसथांब्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. संचलनातील जवळपास ५० टक्के बस एकाच वेळी बंद झाल्याने, अनेक मार्गांवर अर्ध्या तासाला येणारी बस जवळपास दीड ते दोन तासांनी गर्दीने भरून येत होती. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. त्यातच काहीच माहिती नसल्याने प्रवाशांचा आणखी गोंधळ उडत होता. अखेर बस येत नसल्याने; तसेच आलेल्या बसमध्ये बसण्यासाठी जागाच नसल्याने अनेकांना आर्थिक झळ सोसून रिक्षा; तसेच खासगी वाहनांचा आधार घेऊन घर गाठावे लागले.पूर्व कल्पना न देताच बंद पीएमपीने दररोज तब्बल १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या मालकीच्या बसची संख्या कमी असल्याने पीएमपीकडून सात वर्षांच्या भाडेकराराने तब्बल ६५३, तर पीपीपी तत्त्वावर २०० बस घेण्यात आल्या आहे. गुरुवारी पीएमपी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पीएमपीकडून सुमारे १५०६ बस रस्त्यांवर आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, पहिल्या शिफ्ट रस्त्यावर आल्या. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास ठेकेदारांनी अचानक कोणतीही माहिती अथवा पूर्व कल्पना न देता, सकाळ शिफ्ट मधील; तसेच दुसऱ्या शिफ्टमध्ये रस्त्यावर येणाऱ्या सर्व बस थांबविल्या. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. दुपारी एकपर्यंत याची साधी कुणकुण पीएमपी प्रशासनास लागू देण्यात आली नाही. दुपारी १ नंतर जेव्हा ठेकेदारांच्या बस येत नसल्याचे लक्षात आले, तेव्हा पीएमपी प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळाली.पीएमपीकडून हजार बसचे नियोजन दुपारनंतर अचानक ठेकेदारांनी बंद पुकारल्याने पीएमपीचे नियोजन अक्षरश: कोलमडले होते. त्यातच पीएमपीच्या अवघ्या ७५० बस संचलनात असल्याने सायंकाळी नियोजन करणे जिकिरीचे बनले होते; मात्र अचानक आलेल्या या आपत्तीवर मात करण्यासाठी पीएमपीकडून तातडीने ब्रेकडाउनसाठी; तसेच देखभाल दुरुस्तीसाठी आलेल्या बसचे काम थांबवून तब्बल अडीचशे जादा बस रस्त्यावर आणून सायंकाळी ५ नंतर जवळपास ९०० बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. मात्र, ही संख्या दैनंदिन मार्गावरील बसपेक्षा कमी असल्याने प्रवाशांच्या गर्दीने सर्व बसथांबे ओसंडून वाहत होते; मात्र त्याची कोणतीही कल्पना प्रवाशांना नसल्याने अनेक जण ताटकळत बसथांब्यांवर उभे असल्याचे दिसून आले. हा प्रकार म्हणजे, पीएमपी प्रशासनाचा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकार म्हणजे थेट ब्लॅकमेलिंग असून, तो कधीही सहन केला जाणार नाही. ठेकेदारांशी झालेल्या करारानुसार, त्यांनी कोणतीही कल्पना न देता हा बंद पुकारला आहे. त्यांच्या तक्रारी असल्यास, त्यांनी त्या लेखी कळविणे आवश्यक आहे; मात्र तसा साधा अर्जही ठेकेदारांनी केलेला नाही. या प्रकरणानंतर ठेकेदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल बंद करून ठेवले होते. त्यांनी उद्या बस रस्त्यावर न आणल्यास, मेस्मा लावला जाईल.- अभिषेक कृष्णा (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीएमपी)