शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 2:08 PM

राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय

नागरिक ज्या प्रमाणात बाहेर पडत आहेत ते लक्षात घेता जिल्ह्याबाहेर पडणाऱ्या लोकांना 15 दिवसांचे विलगिकरण बंधनकारक करण्याचा विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. पुण्यामध्ये आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी राज्यात रुग्ण संख्या कमी झाले नाहीये. त्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

"आजच्या बैठकीत नवीन विषय पुढे आले. शनिवार रविवार देखील चालू राहणार नाही पुढचा शनिवार रविवार परिस्थीती आटोक्यात आलं तर पुन्हा विचार. काही जिल्ह्यांमध्ये अजून प्रमाण आहे.खूप मोठ्या प्रमाणावर शनिवार रविवार प्रचंड गर्दी आणि रांगा लागत आहेत. नागरी का असं करतायेत कळत नाही. नागरिकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.जास्त लोक बाहेर जात राहिले तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या लोकांना 15 दिवस विलागिकरणात राहावे लागेल याचा विचार सुरू."

दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे असे सांगताना पवार म्हणाले,"अनेक देशात लसीकरण होऊनही पुन्हा लाट आली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या मृत्यूंचा अभ्यास केला तर 60% मृत्यू हे 60 पेक्षा कमी वयाचा लोकांचे आहेत. पुढच्या आठवड्यात पुण्याचा देखील अहवाल सादर करण्याचे आदेश. 43% लोक कोणताही आजार नसणारे आहेत.महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे."

कोव्हॅक्सिन बाबत परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत पवार म्हणाले ," लस घेतलेल्यांना दुसऱ्या लसींचा डोस घेता येणार नाही असा तज्ञांचे मत. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी लस घेता येणार नाही.जी घेतली आहे त्याला परवानगी मिळण्याची वाट पाहावी लागेल."

दरम्यान पुढचा आठवड्यात होणाऱ्या ओबीसी आरक्षणाचा बैठकीबाबत मी संबंधितांशी याबाबत चर्चा करेन आणि नियम पाळावे यासाठी सूचना देईन असे पवार म्हणाले.दरम्यान पर्यटनासाठी शनिवार रविवार बाहेर पडायचे कारण नाही इतर दिवशी नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटन