शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वनराई जगविण्यासाठी राबतेय ज्येष्ठ अन् तरुणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 11:44 IST

पाण्यासाठी होत आहेत माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे हाल

ठळक मुद्देवन विभागाकडून तयारी; स्वयंसेवी संस्था, शेतकऱ्यांची होतेय मदत 

श्रीकिशन काळे -पुणे : उन्हाचा कडाका जाणवू लागला असल्याने पाण्यासाठी माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील वन्यजीवांसाठी वन विभागातर्फे पाणवठे, टॅँकरची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यात सुमारे तीनशे पाणवठे वन विभागातर्फे तयार केलेले आहेत; तसेच ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, तिथे टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही स्वयंसेवी संस्था, तरुण मुले-मुली, ग्रामपंचायतदेखील त्यासाठी मदत करीत आहेत. उन्हामुळे झाडे वाळून जाऊ नयेत म्हणून अनेक वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था आपापल्या भागात झाडांना पाणी देण्याचे काम करत आहेत. अनेक टेकड्यांवर अशी कामे होत आहेत. वन विभाग प्रत्येक ठिकाणी काम करू शकत नाही. त्यांच्याकडे मनुष्यबळही खूप नसते. म्हणून नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करून झाडांची तहान भागविली पाहिजे. दिघी येथील दत्त गडावर गेल्या अनेक वर्षांपासून ‘अविरत श्रमदान’ या संस्थेतर्फे झाडांची निगा राखली जात आहे. २०१७ पासून या ठिकाणी झाडं लावून त्यांना नियमित पाणी देण्याचे कामही संस्था करीत अहे. सुमारे साडेतीन हजार झाडे येथे हिरवाईने फुलली आहेत. यासाठी संस्थेचे सचिन लांडगे, सुनील पाटील, डॉ. नीलेश लोंढे, जितेंद्र माळी, विश्वजित डोंगरे, अ‍ॅड. सुनील कदम, संदीप पाटील, धनाजी पाटील आदी काम करीत आहेत. रोज सकाळी साडेसहा ते साडे आठ या वेळेत पाणी दिले जाते. पक्ष्यांसाठी खाण्याची सोयदेखील केली आहे, अशी माहिती धनाजी पाटील यांनी दिली. .........

शेतकरीदेखील देताहेत पाणी जिल्ह्यातील पळसदेव (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रात सुमारे २७ हजार झाडे यंदा लावली आहेत. ती जगविण्याचे काम वनपाल आर. डी. इंगवळे करीत आहेत. तसेच, एका ठिकाणी १६०० झाडे आहेत. तिथे देखील शेतकरी नाना भांडे हे आपली पाण्याची मोटार देऊन मदत करीत आहेत. तर, विशाल येडे हे शेतकरी पळसदेव येथील झाडांसाठी मदत करत आहेत. ..........यंदा लावलेली झाडे छोटी असल्याने त्यांना जगविणे गरजेचे आहे, असे इंगवळे यांनी सांगितले. दरम्यान, कडबनवाडी येथील चिंकारा अभयारण्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहे. .........जिल्ह्यात टॅँकरने झाडांना पाणी पुणे जिल्ह्यातील लावलेल्या झाडांना पाण्याची सोय केलेली आहे. वन्यजीवांसाठी देखील पाणवठे तयार आहेत. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींची मदत होत आहे. गतवर्षी आम्ही सरकारकडे टॅँकरसाठी प्रस्ताव दिला होता. त्यातून १२ टॅँकर मिळाले आहेत. त्यातील दोन आता इंदापूरला सुरू आहेत. इतर लवकरच सुरू करणार आहोत.  सध्या जमिनीत अजून ओलावा आहे. एप्रिल मे महिन्यात झाडांना पाणी देण्याची सोय करणार आहोत. - श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग 

टॅग्स :PuneपुणेdighiदिघीIndapurइंदापूरforestजंगलenvironmentपर्यावरण