शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

मुठेकडे पाहून गलबलून येते, पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 03:10 IST

डॉ. तारा भवाळकर : पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

पुणे : माणूस हा संपूर्ण सृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे या सृष्टीवर आपलाच अधिकार असल्याच्या माजातून माणसाने बाहेर यावे. पर्यावरणाच्या बाबतीत लिहिता- वाचता येणारेच अडाणी राहिले. शिक्षण पदवी देते; पण ज्ञान देते की नाही, हा खरा प्रश्न आहे. परंपरा विसरून स्वत:ला साक्षर म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा निरक्षर मंडळी जास्त शहाणी आहेत, असे मला वाटते. मुळा-मुठेच्या सान्निध्यात मी पूर्वी राहत होते. आज त्या नद्यांकडे बघून मन गलबलून येते, अशी खंत लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात भवाळकर बोलत होत्या. प्राचार्य दिलीप शेठ, उपप्राचार्य हनुमंत ठोंबरे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहप्रकाश पायगुडे, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले.‘काळाच्या ओघात आपण गतिमानतेकडून गणितमानतेकडे जायला लागलो. जगणे ज्यांना कळले, त्यांना आम्ही अडाणी म्हणणार का? निरक्षर लोक अधिक शहाणे आहेत. लोकजीवनाशी नाळ तोडल्यानेच आपण अवनतीच्या अवस्थेला आलो. पर्यावरणापेक्षाही प्रकृती हा शब्द योग्य वाटतो. प्रकृतीनेच माणसाला शहाणपण दिले आहे. नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करणाºया आम्ही आता त्याला प्लास्टिकमय करून टाकले आहे.

उत्सवांच्या परंपरा विसरून आपण त्याला शहाणपणाचे मुलामे चढवले आहेत. जे पाणी आपल्याला निसर्ग देतो, ते पाणी शुद्ध करण्याची निसर्गाची स्वत:ची एक क्षमता असते; पण या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आपण पाणी प्रदूषित करतो आणि तिथूनच सगळे प्रश्न सुरू होतात.विद्यार्थ्यांनी माहितीच्या महाजालाचा वापर करताना ज्ञानी होणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचा कल केवळ माहिती मिळविण्याकडे असल्याचे दिसून येते. पर्यावरणाविषयी केवळ आत्मीयता न बाळगता प्रत्यक्ष जीवनात आपण तसे बदल केले पाहिजे.- दिलीप शेठ, प्राचार्य

टॅग्स :Puneपुणे