शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मुठेकडे पाहून गलबलून येते, पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 03:10 IST

डॉ. तारा भवाळकर : पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

पुणे : माणूस हा संपूर्ण सृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे या सृष्टीवर आपलाच अधिकार असल्याच्या माजातून माणसाने बाहेर यावे. पर्यावरणाच्या बाबतीत लिहिता- वाचता येणारेच अडाणी राहिले. शिक्षण पदवी देते; पण ज्ञान देते की नाही, हा खरा प्रश्न आहे. परंपरा विसरून स्वत:ला साक्षर म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा निरक्षर मंडळी जास्त शहाणी आहेत, असे मला वाटते. मुळा-मुठेच्या सान्निध्यात मी पूर्वी राहत होते. आज त्या नद्यांकडे बघून मन गलबलून येते, अशी खंत लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात भवाळकर बोलत होत्या. प्राचार्य दिलीप शेठ, उपप्राचार्य हनुमंत ठोंबरे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहप्रकाश पायगुडे, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले.‘काळाच्या ओघात आपण गतिमानतेकडून गणितमानतेकडे जायला लागलो. जगणे ज्यांना कळले, त्यांना आम्ही अडाणी म्हणणार का? निरक्षर लोक अधिक शहाणे आहेत. लोकजीवनाशी नाळ तोडल्यानेच आपण अवनतीच्या अवस्थेला आलो. पर्यावरणापेक्षाही प्रकृती हा शब्द योग्य वाटतो. प्रकृतीनेच माणसाला शहाणपण दिले आहे. नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करणाºया आम्ही आता त्याला प्लास्टिकमय करून टाकले आहे.

उत्सवांच्या परंपरा विसरून आपण त्याला शहाणपणाचे मुलामे चढवले आहेत. जे पाणी आपल्याला निसर्ग देतो, ते पाणी शुद्ध करण्याची निसर्गाची स्वत:ची एक क्षमता असते; पण या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आपण पाणी प्रदूषित करतो आणि तिथूनच सगळे प्रश्न सुरू होतात.विद्यार्थ्यांनी माहितीच्या महाजालाचा वापर करताना ज्ञानी होणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचा कल केवळ माहिती मिळविण्याकडे असल्याचे दिसून येते. पर्यावरणाविषयी केवळ आत्मीयता न बाळगता प्रत्यक्ष जीवनात आपण तसे बदल केले पाहिजे.- दिलीप शेठ, प्राचार्य

टॅग्स :Puneपुणे