शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

मुठेकडे पाहून गलबलून येते, पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 03:10 IST

डॉ. तारा भवाळकर : पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

पुणे : माणूस हा संपूर्ण सृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे या सृष्टीवर आपलाच अधिकार असल्याच्या माजातून माणसाने बाहेर यावे. पर्यावरणाच्या बाबतीत लिहिता- वाचता येणारेच अडाणी राहिले. शिक्षण पदवी देते; पण ज्ञान देते की नाही, हा खरा प्रश्न आहे. परंपरा विसरून स्वत:ला साक्षर म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा निरक्षर मंडळी जास्त शहाणी आहेत, असे मला वाटते. मुळा-मुठेच्या सान्निध्यात मी पूर्वी राहत होते. आज त्या नद्यांकडे बघून मन गलबलून येते, अशी खंत लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात भवाळकर बोलत होत्या. प्राचार्य दिलीप शेठ, उपप्राचार्य हनुमंत ठोंबरे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहप्रकाश पायगुडे, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी संमेलनामागील भूमिका विशद केली. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले.‘काळाच्या ओघात आपण गतिमानतेकडून गणितमानतेकडे जायला लागलो. जगणे ज्यांना कळले, त्यांना आम्ही अडाणी म्हणणार का? निरक्षर लोक अधिक शहाणे आहेत. लोकजीवनाशी नाळ तोडल्यानेच आपण अवनतीच्या अवस्थेला आलो. पर्यावरणापेक्षाही प्रकृती हा शब्द योग्य वाटतो. प्रकृतीनेच माणसाला शहाणपण दिले आहे. नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करणाºया आम्ही आता त्याला प्लास्टिकमय करून टाकले आहे.

उत्सवांच्या परंपरा विसरून आपण त्याला शहाणपणाचे मुलामे चढवले आहेत. जे पाणी आपल्याला निसर्ग देतो, ते पाणी शुद्ध करण्याची निसर्गाची स्वत:ची एक क्षमता असते; पण या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आपण पाणी प्रदूषित करतो आणि तिथूनच सगळे प्रश्न सुरू होतात.विद्यार्थ्यांनी माहितीच्या महाजालाचा वापर करताना ज्ञानी होणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचा कल केवळ माहिती मिळविण्याकडे असल्याचे दिसून येते. पर्यावरणाविषयी केवळ आत्मीयता न बाळगता प्रत्यक्ष जीवनात आपण तसे बदल केले पाहिजे.- दिलीप शेठ, प्राचार्य

टॅग्स :Puneपुणे