शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 12:20 PM

केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे : सभ्य किंवा सुसंस्कृत समाजामधील सर्व लोक हे उदारमतवादी आणि धोती-कुर्ता वेश परिधान केला तर आम्ही असभ्य आणि प्रतिगामी अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जात असल्याची टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.दखनी अदाब फाउंडेशनतर्फे ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सभ्य समाजात उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या मंडळींना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही, म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारले जातात. किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मात्र, लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात, हा प्रश्न आहे. देश एकसंध राहण्यासाठी आणि देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.............कलेला जातधर्म नसतो. त्यापलीकडे जाऊन साहित्य निर्माण व्हायला हवे. देशात स्वतंत्रता हवी असे आपण म्हणतो; पण इथे इतिहास विदेशी लोकांचा शिकवला जात आहे हे आपले दुर्दैव आहे.- सत्यपाल सिंह .............

प्रत्येक शहर, गल्लीत साहित्य महोत्सव भरवले जात आहेत, अशी टीका केली जाते. फॅशन म्हणून लोक येतात अस म्हटलं जातं; पण दोन लोकांची मने जरी बदलली तरी पुष्कळ आहे. ज्या देशाची कला समृद्ध असते तिथली अर्थव्यवस्था सुदृढ राहते.- विशाल भारद्वाज ............

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी