शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सावित्रीच्या लेकींनी गाजवली दिल्ली; महाराष्ट्राच्या दहापैकी दहा मुलींचा राजपथावर डंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:56 IST

राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता.

ठळक मुद्देदेशाच्या नेतृत्वासह तीन स्पर्धेत अव्वल, आरडी कॅम्पसाठी २४ जणांचा संघ

दीपक होमकर- पुणे : आर्मी असो, नेव्ही असो किंवा एअर विंग साऱ्याच विभागामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या गर्ल्स कॅडेटने इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सरस कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला. संपूर्ण भारतातील मुलींच्या तुकडीचे राजपथावर नेतृत्व,  एअर विंग संपूर्ण भारतातून बेस्ट कॅडेटचा किताब, नेव्हल विंगमध्ये बेस्ट कॅडेट रनरअपचा किताब आणि डायरेक्टर जनरलकडून मिळणारा डी. जी. कमांडेशचा किताब अशी सर्वोत्तम कामगिरी करत सावित्रीच्या लेकींनी दिल्ली गाजविली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त (आर. डी. कॅम्प) दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या शिबिरातील सर्वच स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने यश मिळविले, त्यामध्ये दहा मुलींनी सिंहाचा वाटा उचलला.  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा केवळ २४ जणांचा संघ आरडी कॅम्पसाठी दिल्लीत रवाना झाला होता. त्यामध्ये दहा मुली आणि चौदा मुलांचा सहभाग होता. विशेष म्हणजे, राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता. त्यामध्ये येथून गेलेल्या दहाच्या दहा मुलींची सामावेश होता, तर चौदापैकी अकरा मुलांचा समावेश होता. कॅडेट्सबरोबरच संघ व्यवस्थापक म्हणून त्यांच्या समवेत गेलेल्या बार्शीच्या मेजर आरुषा शेटे यांना सुद्धा डी. जी. कमांडेशचा किताब देण्यात आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला शक्ती दिसून आली.— कशीश मेटवाणीसमोर आकाश झाले ठेंगणेपुणे विद्यापीठामध्ये बायोटेक एमएससी (इंटिग्रेट मार्सस) कोर्स करणाऱ्या कशीश मेटवाणी ही यंदा महाराष्ट्र संघाकडून बेस्ट कॅडेटच्या (एअर विंग) स्पर्धेत उतरली होती, लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्चा अशा सर्व पातळ्यावंर तीने २८ राज्यांच्या मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटचा किताब पटकाविला. पुढे जाऊन फायटर प्लेन पायलेट बनण्याचे ध्येय तिने ठेवले असून त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरवात केली आहे.— तनया नलवडेचे कर्तत्व सागराहून गहरेपुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बीएससी करणाऱ्या तनया नलवडे ही महाराष्ट्रासंघाकडून बेस्ट कॅडेटसाठी (नेवल विंग)च्या स्पर्धेत उतरली होती. लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्च अशा सर्व पातळ्यांवर तिने २८ राज्यांच्या सर्व मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटच्या दुसऱ्या क्रमांकाचा किताब पटकाविला. आंध्र प्रदेशच्या नेव्हल विंगच्या मुलीने तिच्यावर केवळ एक गुणानी मात केली.  विमाननगर येथील एअरफोर्स स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले असले, तरी तिने इंडियन नेव्हीमध्येच करिअर करायचे ठरवले आहे.—समृध्दी संतने केले देशाचे नेतृत्वअमरावती येथील महाविद्यालयात शिकणारी समृध्दी संत हिने राजपथावर झालेल्या संचलनात मुलींच्या राष्ट्रीय तुकडीचे नेतृत्व केले. २८ राज्यांतून आलेल्या सर्व मुलींमधून सुमारे शंभर मुलींची निवड राजपथावरील संचलनासाठी झाली होती. त्या शंभर मुलींचे नेतृत्व करण्याचा बहमान समृध्दीला मिळाला. इंडिअन आर्मी मध्ये करीअर करण्यासाठी तीने यूपीएसची तयारी सुरू केली असून त्यासाठी एनसीसीची विशेष मदत तिला झाल्याचे तिने सां.गितले—द्यानवी ककोनियाला अधिकाऱ्यांची पसंतीपुण्यातील मॉडर्न कॉलेजध्ये बीएससी बायोटक करणारी द्यानवी ककोनियाला हिने डीजी कमांडेशन हा किताब पटकाविला. एनसीसीमधील तीन वर्षांत कॅडेटची संपूर्ण कामगिरी कशी आहे त्यावरून हा किताब दिला जातो. या स्पर्धेसाठीही २८ राज्यांतून आलेल्या मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये द्यानव सर्वोत्तम ठरली. इंडियन आर्मीमध्ये करिअर करणार असून त्यासाठी तिने डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षांचा अभ्यास सुरु केला असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीWomenमहिलाRepublic Dayप्रजासत्ताक दिन