शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पगार गलेलठ्ठ, पण नोकरीची शाश्वती नसल्याने आयटीयन्स त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 04:09 IST

फोरम फॉर आयटी एम्प्लोयी या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात अचानक कामावरून काढलेल्या १०० पेक्षा अधिक आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालय आणि कामगार न्यायालयात धाव घेत आम्हाला नोकरीवरून का काढले, असा सवाल कंपन्यांना केला आहे.

- सनील गाडेकर पुणे : जॉब असावा तर आयटीमध्ये... भरपूर पगार...शनिवार-रविवार सुटी...वर्ककल्चर पण भारी.. इतर सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचे आणि नागरिकांचे आयटी फिल्डबाबत जवळपास असेच मत आहे. यात बºयाच अंशी तथ्य असले, तरी व गलेगठ्ठ पगार असला, तरी या क्षेत्रात नोकरीची शाश्वती मिळत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.कॉस्टकटिंग करायची असल्याने परफॉर्मन्स चांगला नसल्याचे कारण देत कर्मचाºयांना नोकरीवरून काढून टाकण्याचे प्रकार या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. फोरम फॉर आयटी एम्प्लोयी या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात अचानक कामावरून काढलेल्या १०० पेक्षा अधिक आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालय आणि कामगार न्यायालयात धाव घेत आम्हाला नोकरीवरून का काढले, असा सवाल कंपन्यांना केला आहे. अचानक कामावरून कमी केलेले कर्मचारी सुरुवातील कामगार आयुक्तालयात आपली कैफियत मांडत आहे. कामगार आयुक्त अशा प्रकरणात चर्चा करून मार्ग काढू शकतात. त्यातील बोनस, पेन्शन, वैद्यकीय खर्चाबाबतचे प्रकरणे या ठिकाणी मिटत आहेत; मात्र नोकरीवरून काढल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारी शक्यतो न्यायालयात जात आहेत, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.अचानक आलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे हतबल झालेला तरुण कमी पगार का असेना; पण एखाद्या छोट्यामोठ्या कंपनीत रुजू होत आहेत. संबंधित कर्मचारी जेव्हा नोकरीसाठी नवीन कंपनीत जातो, तेव्हा त्यांना वाटते की याला परफॉर्मन्समुळे काढले असेल. कर्मचाºयांना अनेक महिने बेरोजगारीचा सामाना करावा लागत आहे. काहींना तर स्वत:चे केक शॉप किंवा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींनी कॅब चालवणे पसंत केले आहे. कोणत्याही कर्मचाºयाला कामावरून काढताना किमान ६ महिने नोटीस दिली जावी; तसेच कमी करण्याचे योग्य कारण असलेले पत्र मिळावे. या दोन्ही गोष्टींमुळे पुढील नोकरी मिळणे अधीक सोयीस्कर होईल; तसेच चांगल्या मुलांच्या करिअरचे नुकसानही होणार नाही, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. आयटीमधील २० टक्के कर्मचारी हे केपीओ व बीपीओमध्ये (कॉल सेंटर) काम करणारे आहेत. १० ते १२ तास काम करूनही त्यांना केवळ १२ ते १६ हजार रुपये पगार दिला जातो. किमान वेतन आयोगाचे कोणतेही नियम नाहीत.कमिटीची स्थापन करावीसध्या पुण्यात ८ ते १० लाख आयटी कर्मचारी आहेत; मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नाही. त्यामुळे आयटी कंपनी व तेथील कर्मचाºयांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने कमिटीची स्थापना करावी. कामावरून काढताना कोणते नियम आहेत, रात्रपाळीला काम करणाºयांना किती भत्ता दिला पाहिजे, कर्मचाºयांचे अधिकार काय आहेत, याबाबत कमिटीने काम करावे अशी मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष पवनजित माने यांनी केली आहे.प्रसूती रजाही ठरतेय धोकादायकसुधारित कामगार कायद्यानुसार महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा देणे आवश्यक आहे; मात्र एखादी महिला कर्मचारी गरोदर असल्याचे समजताच अनेक छोट्या कंपन्या त्यांना थेट कामावरून काढून टाकतात. तिला सहा महिन्यांचा पगार द्यावा लागू नये हे, त्यामागील प्रमुख कारण असते. त्यामुळे प्रसूती रजाही महिला कर्मचाºयांसाठी धोकादायक ठरत आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानPuneपुणे