शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

भावनांवर स्वार सत्ताधाऱ्यांकडे अर्थभान नाही : भालचंद्र मुणगेकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:34 IST

देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक अज्ञानातून हे संकट निर्माण झाले आहे...

ठळक मुद्देपक्षभेद विसरून अर्थतज्ज्ञांच्या परिषदेचे आवाहनसार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवावीअर्थचक्र गतिमान होणे गरजेचे आहे व ते लोकांकडे पैसा आल्याशिवाय ते शक्य नाही..

पुणे: भावनांवर स्वार झालेल्या सत्ताधाऱ्यांकडे अर्थभान नाही. नोटाबंदी, जीएसटी या चुकीच्या निर्णयांमुळे देश आर्थिक मंदीत प्रवेश करत आहे. यातून वाचायचे असेल तर सत्ताधाऱ्यांनी पक्षीय भेद विसरून देशातील अर्थतज्ज्ञांची एक गोलमेज परिषद आयोजित करावी, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. काँग्रेसभवनमध्ये मुणगेकर यांनी अर्थव्यवस्थेपुढील मंदीचे आव्हान व त्यावरील उपाययोजना या विषयांवर माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी यावेळी उपस्थित होते. मुणगेकर म्हणाले, देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक अज्ञानातून हे संकट निर्माण झाले आहे, मात्र ते मान्य करायला त्यांचा अहंकार आड येतो आहे. अर्थचक्र निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रांसमोर आर्थिक अडचणी तयार होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. ते भान दिवंगत अरूण जेटली यांच्याकडे होते, मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये आता असे कोणीही नाही व त्यांना कोणाचे ऐकायचेही नाही.  आर्थिक अडचणी स्पष्ट करताना मुणगेकर म्हणाले, चार वर्षांपुर्वी घेतलेला नोटाबंदी व दोन वर्षांपुर्वी घेतलेला जीएसटीचा निर्णय या सगळ्याच्या मुळाशी आहे. छोटे, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे त्यातून मोडले. बचत, गुंतवणूक, आयात, निर्यात, औद्योगिक उत्पादन, रोजगार या अर्थव्यवस्थेशी निगडीत सर्वच घटकांवर गंभीर परिणाम झाले आहेत. कोळसा, स्टील, खते, मिनरल्स या उद्योगांचे उत्पादन घटत आहे. हे कशामुळे होत आहे हे कळत नसल्यामुळेच कॅब सारख्या वाहनव्यवस्थेवर त्याचे खापर फोडण्याचा वेडेपणा अर्थमंत्री करत आहेत. यातून वाचायचे असेल तर देशातील अर्थतज्ञांना एकत्र करून राज्यकर्त्यांनी त्यांची गोलमेज परिषद आयोजित करून तिथे हा विषय मांडायला हवा. चचेर्तूनच उपाययोजना सापडतील.

सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवावीअर्थचक्र गतिमान होणे गरजेचे आहे व ते लोकांकडे पैसा आल्याशिवाय ते शक्य नाही. पैसा आणायचा असेल तर मग खासगी गुंतवणूक सोडून सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी. काही उद्योगांना जीएसटीत सवलत द्यायला हवी. वाहन व बांधकाम या दोन्ही क्षेत्रांना प्राधान्य द्यावे तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावरील खर्च वाढवावा. त्यामुळे स्थितीत थोडातरी फरक पडेल असे मुणगेकर म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्थाBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरBJPभाजपाGovernmentसरकार