शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पाणी प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 22:20 IST

पाणी प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, पाणी गळतीचा मुद्दा चर्चेत....

पुणे : शहरात समान पाणीपुरवठा योजनेची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण होतील. त्यामुळे पाणीगळती कमी होऊन महापालिका जादा पाणी उचलते हा आरोप संपेल. त्यामुळे हा पाणी प्रश्नही निकाली लागेल. याचेच वेळापत्रक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडले आहे. मात्र, यावरून समाधान झाले नाही, असे नकारात्मक बोलून चालणार नाही. मग तुमच्या काळातच हा प्रश्न मार्गी का लागला नाही’, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केला. राजकीय मुद्दा बनवून विकासकामांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर शहराच्या पिण्याच्या व ग्रामीण भागाच्या पाण्याबाबत शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत अजित पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर तीच ती उत्तरे दिली जातात, असा आरोप केला. त्यानंतर पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांची पाठराखण केली. त्यांनी केलेले सादरीकरण हे उत्तम आहे. त्यातून मी समाधानी आहे. पाणी गळती रोखण्यासाठी शहरात सुरू असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून ८४ टाक्या उभारल्या जात आहेत. त्यातील ४२ पूर्ण झाल्या आहेत. २२ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर ११ टाक्यांना जागा नसल्याने त्यांना अन्य टाक्यांमध्ये समाविष्ट केले आहे. तीन टाक्यांना जागा मिळाल्याने त्यांच्या कामाचे टेंडर निघाले आहे. या कामासाठी जलवाहिनी टाकण्याचे कामही येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे, तसेच यामुळे गळतीही रोखली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे सप्टेंबर २०२३ पर्यंत गळती कमी होऊन पाणी वापर कमी होणार आहे, यात अधिकाऱ्यांची काहीही चूक नाही.

जायका उपयुक्तच

जायका प्रकल्पामुळे पाणी मिळणार नाही, या पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर पालकमंत्र्यांनी मी समाधानी असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे आठ ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. हे पाणी टॅंकरद्वारे उचलून बांधकामांसाठी, बागकामांसाठी, गाड्या धुण्यासाठी दिले जाईल. त्यातूनही पिण्याच्या पाण्याचा वापर कमी होईल.

सोसायट्यांना मदत करू

सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गळती आहे. त्यांना याबाबत नोटिसा देऊन भागणार नाही. त्यासाठी त्यांनी या टाक्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी मी एक प्रस्ताव दिला आहे. त्यात दुरुस्तीचा हा खर्च प्रत्येकी २५ टक्के सोसायटी, आमदार निधी, नगरसेवक निधी व जिल्हा नियोजन समितीतून दिला जाईल. मात्र, पवार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. आमदार निधी देणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते; पण या निधीची अन्य ठिकाणाहून पूर्तता करता येणे शक्य आहे. त्यातून हा प्रश्न सुटू शकेल.’

दुरुस्तीमध्ये कॉलन्यांचा सहभाग लागेल

शहरातील गळती शोधण्याचे काम नजीकच्या काळात केले जाईल. त्यासाठी साठी एक संस्थेची नेमणूक करू. त्यात कॉलनीतील टाक्यांमध्ये गळती असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी सरकार मदत करेल; पण कॉलनीनेसुद्धा निधीत सहभाग द्यावा लागेल; अन्यथा शहरात पाणीमीटर सुरू झाल्यानंतर गळतीसहित तुम्ही वापरलेल्या पाण्याचे बिल तुम्हाला द्यावे लागले, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी