शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

जलस्रोतांमध्ये झाला खडखडाट

By admin | Updated: May 10, 2017 03:58 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते; परंतु अवघ्या पंजोबा उपार्जित काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करीत वणवण करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुखत्वेकरून या भागातील विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे हे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये त्यात पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षभरातील तीन महिने या भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या जिवावर काढावे लागत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी शासनाकडून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले. परंतु, या भागात पडणाऱ्या दुष्काळापुढे या जलस्रोतांनीही गुडघे टेकले आहेत. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्यातील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले. या पाण्याची दुर्गंधी येत असून, पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. परिणामी, या भागातील आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत अहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असूनही आदिवासी जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. पाणी आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. बस झालं आता नुसतीच आश्वासनं अन् नुसताच तोंडावरून पोचारा. आता आम्हा आदिवासींनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे,’ असे आदिवासी बांधव काळू बाळू लोहकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, तळेघर, राजपूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरी, माचीची वाडी, काळवाडी नं. १ व नं. २, नानवडे, माळीण, आमडे, कोंढरे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, आवळेवाडी, घोडेवाडी, माळवाडी, घोटमाळ, गोहे बुद्रुक, बोरीची वाडी, पाटीलबुवाची वाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पसडळवाडी, पाचवड, पोटकुलवाडी, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहेत.