शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

जलस्रोतांमध्ये झाला खडखडाट

By admin | Updated: May 10, 2017 03:58 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते; परंतु अवघ्या पंजोबा उपार्जित काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करीत वणवण करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुखत्वेकरून या भागातील विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे हे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये त्यात पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षभरातील तीन महिने या भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या जिवावर काढावे लागत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी शासनाकडून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले. परंतु, या भागात पडणाऱ्या दुष्काळापुढे या जलस्रोतांनीही गुडघे टेकले आहेत. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्यातील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले. या पाण्याची दुर्गंधी येत असून, पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. परिणामी, या भागातील आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत अहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असूनही आदिवासी जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. पाणी आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. बस झालं आता नुसतीच आश्वासनं अन् नुसताच तोंडावरून पोचारा. आता आम्हा आदिवासींनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे,’ असे आदिवासी बांधव काळू बाळू लोहकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, तळेघर, राजपूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरी, माचीची वाडी, काळवाडी नं. १ व नं. २, नानवडे, माळीण, आमडे, कोंढरे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, आवळेवाडी, घोडेवाडी, माळवाडी, घोटमाळ, गोहे बुद्रुक, बोरीची वाडी, पाटीलबुवाची वाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पसडळवाडी, पाचवड, पोटकुलवाडी, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहेत.