शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून शिकारीला परवानगी द्या; माधव गाडगीळ यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 20:55 IST

सरकारच्या वनक्षेत्रात त्या प्राण्यांना संंरक्षण द्या ना, पण वन क्षेत्राच्या बाहेर आले तर त्यांची शिकार करायला हवी

पुणे : आपल्या देशात पूर्वीपासून प्राण्यांच्या शिकारी होत आहेत. परंतु, वन्यजीव संरक्षण कायदा आला आणि या शिकारी बंद झाल्या. हे अन्नसाखळीच्या विरोधात आहे. आता गावांमध्ये बिबटे घुसून माणसांना मारत आहेत. हत्ती शेतीची नासधुस करीत आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे. ही परवानगी स्थानिक पातळीवर हवी. ज्या परिसरात अधिक वन्यप्राणी असतील, तिथे शिकारीचे परवाने द्यावेत, असे परखड मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

ॲडव्हेंचर फांउडेशनच्या वतीने दिला जाणारा पंधरावा श्री मारूती चित्तमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना गोवा राज्याच्या जैवविविधता बोर्डाचे अध्यक्ष राजेंद्र केरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

गाडगीळ म्हणाले, सध्या शहरी पर्यावरणप्रेमींमुळे अन्न साखळीचे संतुलन योग्य होत नाही. सर्वजण वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पुढे येतात. पण हेच वन्यजीव आज गावांमध्ये निष्पाप माणसांवर हल्ले करत आहेत. मागे एका बिबट्याने गावात घुसून पाच वर्षीय मुलीला ओढून नेले. हे कुठपर्यंत सहन करायचे. हे थांबले पाहिजे आणि म्हणून शिकारीला परवानगी द्यायला हवी. सरकारच्या वनक्षेत्रात त्या प्राण्यांना संंरक्षण द्या ना ! पण वन क्षेत्राच्या बाहेर आले तर त्यांची शिकार करायला हवी.

प्रदूषण मंडळाचे अधिकारी फक्त लाच घेतात

आज पशू-पक्षी वाचविण्यापेक्षा नदीचे प्रदूषण कमी करायला हवे. कारण सर्व नद्या प्रदूषित आहेत. तरी देखील प्रदूषण मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना केवळ लाच घेऊन द्या प्रदूषित नाहीत, असाच अहवाल देण्याचे सांगितले जाते. आज नदीमध्ये जस्त, मक्युरी, पारा हे घातक धातू आढळतात. त्यावर हे अधिकारी काही करत नाहीत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नागरिकांनी विरोध करायला हवा, असे आवाहन गाडगीळ यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेforestजंगलforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवSocialसामाजिक