शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून शिकारीला परवानगी द्या; माधव गाडगीळ यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 20:55 IST

सरकारच्या वनक्षेत्रात त्या प्राण्यांना संंरक्षण द्या ना, पण वन क्षेत्राच्या बाहेर आले तर त्यांची शिकार करायला हवी

पुणे : आपल्या देशात पूर्वीपासून प्राण्यांच्या शिकारी होत आहेत. परंतु, वन्यजीव संरक्षण कायदा आला आणि या शिकारी बंद झाल्या. हे अन्नसाखळीच्या विरोधात आहे. आता गावांमध्ये बिबटे घुसून माणसांना मारत आहेत. हत्ती शेतीची नासधुस करीत आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे. ही परवानगी स्थानिक पातळीवर हवी. ज्या परिसरात अधिक वन्यप्राणी असतील, तिथे शिकारीचे परवाने द्यावेत, असे परखड मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

ॲडव्हेंचर फांउडेशनच्या वतीने दिला जाणारा पंधरावा श्री मारूती चित्तमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना गोवा राज्याच्या जैवविविधता बोर्डाचे अध्यक्ष राजेंद्र केरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

गाडगीळ म्हणाले, सध्या शहरी पर्यावरणप्रेमींमुळे अन्न साखळीचे संतुलन योग्य होत नाही. सर्वजण वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पुढे येतात. पण हेच वन्यजीव आज गावांमध्ये निष्पाप माणसांवर हल्ले करत आहेत. मागे एका बिबट्याने गावात घुसून पाच वर्षीय मुलीला ओढून नेले. हे कुठपर्यंत सहन करायचे. हे थांबले पाहिजे आणि म्हणून शिकारीला परवानगी द्यायला हवी. सरकारच्या वनक्षेत्रात त्या प्राण्यांना संंरक्षण द्या ना ! पण वन क्षेत्राच्या बाहेर आले तर त्यांची शिकार करायला हवी.

प्रदूषण मंडळाचे अधिकारी फक्त लाच घेतात

आज पशू-पक्षी वाचविण्यापेक्षा नदीचे प्रदूषण कमी करायला हवे. कारण सर्व नद्या प्रदूषित आहेत. तरी देखील प्रदूषण मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना केवळ लाच घेऊन द्या प्रदूषित नाहीत, असाच अहवाल देण्याचे सांगितले जाते. आज नदीमध्ये जस्त, मक्युरी, पारा हे घातक धातू आढळतात. त्यावर हे अधिकारी काही करत नाहीत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नागरिकांनी विरोध करायला हवा, असे आवाहन गाडगीळ यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेforestजंगलforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवSocialसामाजिक