शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:34 AM

शेतकऱ्याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

पुणे : नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळावे, सुरक्षितता वाटावी यासाठी शासनाकडून शेतकरी पीक विमा योजना सुरू केली आहे; मात्र या योजनेचा खरा लाभार्थी रिलायन्स कंपनी आहे. शेतकऱ्याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केला.पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या कै. वि. श्री. जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.ते म्हणाले की, पीक विमा योजनेचा आत्तापर्यंत ४ हजार कोटी रुपये विमा प्रिमीयम भरला आहे; मात्र नुकसानग्रस्त शेतकºयांना केवळ १ हजार ६०० कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. विमा कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा फायदा झाला असून, त्यातील सर्वाधिक वाटा हा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला मिळाला आहे.काँग्रेस सरकारच्या काळात महसुलात १८ टक्के वाढ होती. या सरकारच्या काळात हा आकडा ११ टक्के झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकार खोटे आकडे सांगण्यात आणि आकड्यांचा खेळ खेळण्यात माहीर आहे. यातून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असाही आरोप विखे पाटील यांनी केला.जलयुक्त शिवार योजनेवर टीकास्त्र सोडत विखे-पाटील म्हणाले की, जलयुक्त नव्हे झोलयुक्त शिवार योजना आहे. कृषीसाठी विभागवार वेगवेगळे धोरण असणे गरजेचे आहे. विखे पाटील म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. त्यांच्यासारखे अनेक तरुण सध्या समाजात आहेत. सनातनसारख्या कट्टरवादी संस्थांच्या वाढत्या कारवाया घातक असून, त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदूच होते.सनातनी प्रवृत्ती असलेल्या संस्थांनी आंदोलने केली. त्यातून अंदुरे व कळसकर घडले आहेत. त्यामुळे या संघटनेला ठेचून काढले पाहिजे. मात्र, त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. ‘एटीएस’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपींना पकडल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदनदेखील केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री या संघटनांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न आहे.प्रकाश आंबेडकरांशी बोलणारभाजपाच्या इशाºयावर ‘एमआयएम’चे काम चालते. या पक्षासोबत भारिप बहुजन महासंघाने युती केल्याचे समजते. यामागील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप कळालेले नाही; मात्र मी स्वत: अ‍ॅड. आंबेडकर यांच्याशी बोलणार आहे. त्यांना महाआघाडीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याशिवाय बहुजन समाज पार्टीसोबतही बोलणे सुरू असून, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणारच आहे. इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे विखे-पाटील म्हणाले.पत्रकार संरक्षणाचा मुद्दा मांडणारपत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे पत्रकारांना सर्व बाजूंनी संरक्षण आणि सुरक्षिततेचा मुद्दा मी आगामी अधिवेशनात मांडणार असून, यासंबंधीचा अहवाल त्वरित केंद्राला पाठवावा, यासाठी आग्रही राहणार आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Relianceरिलायन्सRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस