शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:03 AM

भामा-आसखेड धरणांमध्ये जमिन गेलेल्या प्रकल्पबांधित शेतकºयांना आपल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली १६/२ ची नोटिसा देणे, बाधित गावांमध्ये नागरी सुविधांसाठी अडीच कोटींच्या कामांचा प्रस्ताव तयार करणे, जिल्ह्यातील इतर प्रकल्पात शिल्लक जमिनींची माहिती संकलीत करणे

पुणे - भामा-आसखेड धरणांमध्ये जमिन गेलेल्या प्रकल्पबांधित शेतकºयांना आपल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली १६/२ ची नोटिसा देणे, बाधित गावांमध्ये नागरी सुविधांसाठी अडीच कोटींच्या कामांचा प्रस्ताव तयार करणे, जिल्ह्यातील इतर प्रकल्पात शिल्लक जमिनींची माहिती संकलीत करणे, शेतक-यांना पाणी परवान्यांचे वाटप करणे, पाणलोट क्षेत्रातील गावांसाठी अनुदान देणे आदी अनेक सकारात्मक निर्णय गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे प्रकल्पग्रस्तांना आपला प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाल्या आहेत.खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणासाठी २००० मध्ये एक हजार हेक्टर जमिन संपादित करण्यात आली होती. या धरणामुळे परिसरातील तब्बल १ हजार ३१३ शेतकरी कुटुंबे बाधित झाले आहेत. यापैकी १११ शेतकºयांनी शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी यासाठी ६५ टक्के रक्कम भरली होती. परंतु जलसंपदा विभाग आणि पुनर्वसन विभाग यांच्यातील गोंधळामुळे आपल्याला १६/२ च्या नोटीसच देण्यात न आल्याने ३८८ शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये न्यायालयाने शेतकºयांच्या बाजूने निर्णय देत भामा-आसखडे प्रकल्पग्रस्तांना त्वरित ६५ टक्के रक्कम भरून घेण्यासाठी १६/२ च्या नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु या नोटिसा दिल्यानंतर शेतकºयांना वाटप करण्यासाठी जमीनच शिल्लक नसल्याने पेच निर्माण झाला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांच्यासोबत गुरुवारी भामा-आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ४०३ खातेदारांना १६/२ च्या नोटिसा देऊन ६५ टक्के रक्कम कपातीचे दाखल देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच ही रक्कम कपात केल्यानंतर ज्या शेतकºयांची सर्वाधिक व संपूर्ण जमीन धरणांमध्ये गेली त्यांना प्राधान्यक्रमाने शिल्लक जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळे यांनी सांगितले.तसेच धरणामुळे २३ गावे बाधित झाली असून, या गावांमध्ये रस्ते, पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २.५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने कामे सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या धरणामुळे पाणी असतानादेखील लगतच्या शेतकºयांना हे पाणी उचलता येत नाही. जमिनी घेऊनदेखील प्रकल्पग्रस्तांना पाणी न देण्याच्या जलसंपदा विभागाच्या निणर्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी होती.यावर तोडगा काढत बैठकीमध्ये शेतकºयांना तातडीने पाणी परवान्यांचेदेखील वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळे यांनी सांगितले.

टॅग्स :DamधरणPuneपुणे