शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडलेले आवर्तन १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:13 IST

इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही नाहीकालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर २८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध

पुणे: इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या रब्बीच्या आवर्तनास एक महिना पूर्ण झाला आहे. सध्या दौंड-भिगवन परिसरातील शेतीसाठी पाणी दिले जात असून लवकरच पाटस व यवत भागातील शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बीचे आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.दांडेकर पुलाजवळ झालेल्या कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद ठेवावे लागले होते.पावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही करता आल्या नाहीत.मात्र,काही भागात पावसाच्या हलक्या सरीनंतर जमिनीत निर्माण झालेल्या ओलाव्यावर काही शेतक-यांनी पेरण्यात केल्या होत्या.त्यामुळे ही पिके थोडी तग धरून होती.मात्र,कालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर झाला.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.परंतु,जलसंपदा विभाग व महापालिका प्रशासनाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर २७ आॅक्टोबर रोजी कालव्यातून पाणी सोडण्यात आले.कालव्याद्वारे खडकवासला धरणातून सध्या १२५२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.पाणी सोडून एक महिना पूर्ण झाला आहे.परंतु,ग्रामीण भागातील सर्व क्षेत्राला पाण्याचे वितरण न झाल्याने येत्या १५ डिसेंबरपर्यंत कालवा सुरू ठेवला जाणार आहे.राज्यात दुष्काळी परिस्थिती असून पुणे जिल्ह्यातील धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी खडकवासला धरण प्रकल्पात २५.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.परंतु,२८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वषार्पेक्षा यंदा धरण प्रकल्पात ४.६३ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे.मात्र,पालिका प्रशासनाकडून १३५० एमएलडी पाणी उचलले जात असल्याने उन्हाळी आवर्तण सोडण्यास अडचण येणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पुणेकरांना पिण्यासाठी आणि ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी कसे देता येईल,याबाबत जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीagricultureशेती