शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडलेले आवर्तन १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:13 IST

इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही नाहीकालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर २८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध

पुणे: इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या रब्बीच्या आवर्तनास एक महिना पूर्ण झाला आहे. सध्या दौंड-भिगवन परिसरातील शेतीसाठी पाणी दिले जात असून लवकरच पाटस व यवत भागातील शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बीचे आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.दांडेकर पुलाजवळ झालेल्या कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद ठेवावे लागले होते.पावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही करता आल्या नाहीत.मात्र,काही भागात पावसाच्या हलक्या सरीनंतर जमिनीत निर्माण झालेल्या ओलाव्यावर काही शेतक-यांनी पेरण्यात केल्या होत्या.त्यामुळे ही पिके थोडी तग धरून होती.मात्र,कालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर झाला.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.परंतु,जलसंपदा विभाग व महापालिका प्रशासनाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर २७ आॅक्टोबर रोजी कालव्यातून पाणी सोडण्यात आले.कालव्याद्वारे खडकवासला धरणातून सध्या १२५२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.पाणी सोडून एक महिना पूर्ण झाला आहे.परंतु,ग्रामीण भागातील सर्व क्षेत्राला पाण्याचे वितरण न झाल्याने येत्या १५ डिसेंबरपर्यंत कालवा सुरू ठेवला जाणार आहे.राज्यात दुष्काळी परिस्थिती असून पुणे जिल्ह्यातील धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी खडकवासला धरण प्रकल्पात २५.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.परंतु,२८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वषार्पेक्षा यंदा धरण प्रकल्पात ४.६३ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे.मात्र,पालिका प्रशासनाकडून १३५० एमएलडी पाणी उचलले जात असल्याने उन्हाळी आवर्तण सोडण्यास अडचण येणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पुणेकरांना पिण्यासाठी आणि ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी कसे देता येईल,याबाबत जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीagricultureशेती