शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सामूहिक हत्याकांडातील सात पैकी तिघांचे पुन्हा शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 18:53 IST

दफन केलेली मृतांची शरीरे परत काढली बाहेर

यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात सापडलेले सात पैकी तीन मृतदेहांचे आज परत शवविच्छेदन करण्यात आले. सात जणांच्या सामूहिक हत्याकांडामुळे पोलीस यंत्रणा यातील सर्व बाबी बारकाईने तपासत आहे. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांची हत्या केली असल्याची प्रार्थमिक माहिती पोलीस तपासात समोर आली होती.

संपूर्ण कुटुंबच या हत्याकांडात मरण पावल्याने तसेच नातेवाईक गरीब असल्याने पोलिसांनी नातेवाईकांचे उपस्थितीत यवत येथे अंत्यविधी करत मृतांची शरीर दफन केली होती. मंगळवार दि 24 रोजी चार तर बुधवार दि. 25 रोजी तीन मृतांची शरीरे नवीन मुठा कालव्यालगत दफन करण्यात आली होती.मृत्यू  झालेल्या सात पैकी तिघांचे शवविच्छेदन यवत येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांचे शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले होते. यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केलेल्या तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला आहे. आज पोलिसांनी दफन केलेल्या तीन व्यक्तींची शरीर बाहेर काढून तेथेच पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय टीम, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीत परत शवविच्छेदन करण्यात आले.

पाण्यातून सापडलेली मृत शरीरे कुजलेल्या अवस्थेत होती. यामुळे त्यांचा व्हिसेरा ठेवता आलेला नाही. यामुळे नेमका सात जणांचा खून केला तरी कसा? जर जिवंत असताना यांना पाण्यात टाकले तर त्यांना पोहता येत नव्हते का? आणि नेमकी घटना घडली तरी कशी? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत असून पोलीस तपासात कोणत्या बाबी समोर येतात हेही महत्त्वाचे आहे.

 दैनिक लोकमत मधून मृतांच्या शवविच्छेदन अहवाल बाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांची प्रतिक्रिया छापण्यात आली. सदर प्रतिक्रियेत तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल पोलिसांना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली होती. यामुळे सामूहिक हत्याकांड प्रकरणातील गूढ आणखीच वाढले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकriverनदी