शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

'काँग्रेस ज्याच्या गळ्यात पडली, ते बुडणार' राजनाथ सिंह यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 12:50 IST

सध्या काँग्रेसची स्थिती वाईट आहे. ते ज्यांच्या गळ्यात पडतील, त्याचे बुडणे निश्चित आहे.

पुणे : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. काही महिन्यांपूर्वी येथे आणि हरयाणामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए सरकारला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत हरयाणामध्ये एनडीए सरकारला लोकांनी पसंती दर्शवली आहे. अन् तोच इतिहास महाराष्ट्रातही घडेल, महायुतीची सत्ता येईल, असा मला विश्वास आहे. देशात आजवर जास्त काळ काँग्रेसचं सरकार होतं. तरीदेखील त्यांना गरिबी आणि बेरोजगारी कमी करता आलेली नाही, अशी टीका देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

ते पुढे म्हणाले,'देशात बरीच दशके काँग्रेसचे सरकार होते. मात्र, सध्या काँग्रेसची स्थिती वाईट आहे. ते ज्यांच्या गळ्यात पडतील, त्याचे बुडणे निश्चित आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गळ्यात काँग्रेस पडली आहे, त्यामुळे त्यांचेही बुडणे निश्चित आहे.' असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी सिद्धांतासोबत तडजोड केल्याची टीकाही त्यांनी केली.  भाजपा-महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ गोळीबार मैदान येथे आयोजित जाहीर सभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही. मात्र, सध्या काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाबद्दल खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. वास्तविक ज्या बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र जन्मभूमी, कर्मभूमी आहे, त्या महाराष्ट्रात काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांना योजनाबद्धरीत्या निवडणुकीत हरवले होते. आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. काँग्रेसच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवा होता. मात्र, तो काँग्रेसने दिला नाही.दिलीप कांबळे म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा गेली १० वर्ष विकास करत असताना अनेक प्रश्न आम्ही पुणे महानगरपालिका आणि महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावले आहेत. मग तो घोरपडीचा उड्डाणपूल असेल, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल.आज भारताला पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी येत्या मतदानावेळी कमळासमोरच बटण दाबून विकासाला मतदान करा. सुनील कांबळे म्हणाले, महायुती सरकारने आजवर केलेले काम आणि विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. तेव्हा येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं मत गुन्हेगारांना पोसणाऱ्या उमेदवाराला द्यायचे का माझ्यासारख्या काम करणाऱ्या लोकप्रतीनिधीला द्यायचे? याचा मतदारांनी विचार करावा, असे आवाहन केले.  

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेस