शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Raj Thackeray: "महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या माणसांच्या हाती गेले", राज ठाकरेंचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:54 IST

मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाच्या लोकांनी राजकारणात यावे

पुणे : केवळ निवडणुका लढविणे म्हणजे राजकारण नाही. राजकारण आपल्या सर्वांच्या भविष्याशी निगडित आहे. अनेक वकील, डॉक्टर, कलाकार यांसह विविध पेशांतील व्यक्तींनी राजकारणात येऊन आपले योगदान दिले आहे. राज्याचे राजकारण सध्या चुकीच्या माणसांच्या हाती गेले आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर ठाकरे बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, अतुलकुमार उपाध्ये उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘दैनंदिन आयुष्यात लागणारे दूध, पाणी, वीज या गोष्टींच्या दरापासून शाळेचा अभ्यासक्रम, कोणत्या शहरात कोणता प्रकल्प आणायचा हे सर्व राजकारणी ठरवतात. यावर आपण कोणतेही भाष्य न करता निमूटपणे राजकारण्यांचे निर्णय मान्य करतो. हे चित्र बदलण्यासाठी केवळ घरात बसून बोटे न मोडता जाणत्या नागरिकांनी राजकारणात यावे. मी अशा लोकांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.’’ महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली तर आपण कुठं फरपटत चाललो आहोत आणि कोणामुळे चाललो आहोत, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.

बाबा आमटे यांचे नातू एकदा मुंबईत मला भेटायला आले होते. त्यांना ‘मुंबईत काय काम काढले?’ म्हणून विचारताच ‘संस्थेचा मंजूर निधी अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी मंत्रालयात आलोय’, असे उत्तर दिले. बाबा आमटेंच्या नातवाला अशा किरकोळ कामांसाठी मंत्रालयात झगडा करावा लागतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे समाजकार्याला राजकारणाची धार हवी. त्याकरिता सुज्ञांनी राजकारणात आले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

मध्यम वर्गाचा दबाव राहिला नाही

मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाचा राजकारण्यांवर दबाव राहिला नाही. हाच वर्ग परदेशात स्थायिक झाला असून, राजकारणाला गलिच्छ समजत आहे. लोकप्रतिनिधींना जनतेची भीती उरलेली नाही. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहता अशा लोकांनी राजकारणात यावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणSocialसामाजिकMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र