शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Raj Thackeray: "महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या माणसांच्या हाती गेले", राज ठाकरेंचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:54 IST

मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाच्या लोकांनी राजकारणात यावे

पुणे : केवळ निवडणुका लढविणे म्हणजे राजकारण नाही. राजकारण आपल्या सर्वांच्या भविष्याशी निगडित आहे. अनेक वकील, डॉक्टर, कलाकार यांसह विविध पेशांतील व्यक्तींनी राजकारणात येऊन आपले योगदान दिले आहे. राज्याचे राजकारण सध्या चुकीच्या माणसांच्या हाती गेले आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर ठाकरे बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, अतुलकुमार उपाध्ये उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘दैनंदिन आयुष्यात लागणारे दूध, पाणी, वीज या गोष्टींच्या दरापासून शाळेचा अभ्यासक्रम, कोणत्या शहरात कोणता प्रकल्प आणायचा हे सर्व राजकारणी ठरवतात. यावर आपण कोणतेही भाष्य न करता निमूटपणे राजकारण्यांचे निर्णय मान्य करतो. हे चित्र बदलण्यासाठी केवळ घरात बसून बोटे न मोडता जाणत्या नागरिकांनी राजकारणात यावे. मी अशा लोकांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.’’ महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली तर आपण कुठं फरपटत चाललो आहोत आणि कोणामुळे चाललो आहोत, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.

बाबा आमटे यांचे नातू एकदा मुंबईत मला भेटायला आले होते. त्यांना ‘मुंबईत काय काम काढले?’ म्हणून विचारताच ‘संस्थेचा मंजूर निधी अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी मंत्रालयात आलोय’, असे उत्तर दिले. बाबा आमटेंच्या नातवाला अशा किरकोळ कामांसाठी मंत्रालयात झगडा करावा लागतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे समाजकार्याला राजकारणाची धार हवी. त्याकरिता सुज्ञांनी राजकारणात आले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

मध्यम वर्गाचा दबाव राहिला नाही

मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाचा राजकारण्यांवर दबाव राहिला नाही. हाच वर्ग परदेशात स्थायिक झाला असून, राजकारणाला गलिच्छ समजत आहे. लोकप्रतिनिधींना जनतेची भीती उरलेली नाही. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहता अशा लोकांनी राजकारणात यावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणSocialसामाजिकMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र