शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Raj Thackeray: मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही, नामवंत वकिलाने दिला दाखला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 1:40 PM

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे अनावरण केलेल्या नव्या झेंड्यानंतर राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत लाखो लोकांसमोर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. राज यांची ही सभा घोषणेपासूनच चर्चेत आहे. तर, औरंगाबादच्या सभेत मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा ऐवजी रेल्वे इंजिन घेण्यात आलं आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी राजमुद्रा ऐवजी इंजिन का घेतलं? असा प्रश्नही सर्वांना पडला आहे. तर, राजमुद्रा वापरणं कायदेशीर कि बेकायदेशीर असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. आता, पुण्यातील नामवंत विधिज्ञ असीम सरोदे यांनी राजमुद्राच्या वापराबद्दल कायदेशीर माहिती दिली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे अनावरण केलेल्या नव्या झेंड्यानंतर राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली. या झेंड्यावरून काही जण शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरल्यामुळे राज ठाकरें आणि मनसेवर टीका करताना दिसून आले. तर काहीजण झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यास काहीच हरकत नसल्याचं मत व्यक्त करत आहेत. राजमुद्राच्या वापरावरुन हा वाद असतानाच, औरंगाबादच्या सभेत मनसेच्या झेंड्यावर पुन्हा इंजिन दिसून आले. त्यामुळे, झेंड्यावर राजमुद्रा वापरण्याची चर्चा पुन्हा होताना दिसत आहे. याबाबत, राजमुद्रा वापरणं हे बेकायदेशीर नसल्याचं मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.  

मनसेच्या झेंड्यावरील 'राजमुद्रा' बेकायदेशीर नाही.छत्रपतींची राजमुद्रा स्वाभिमानी इतिहासाची निशाणी आहे. त्या राजमुद्रेचे कुणी कॉपीराइट घेतलेले नाही व घेऊसुद्धा शकत नाहीत. भारत स्वतंत्र झाला तेव्हाच संविधानाने सगळे जुने पद,पदव्या, टायटल्स (जुने चिन्ह, निशाण्या) रद्द केले आहेत. राज ठाकरे यांच्या मनसे च्या झेंड्यावर असलेली 'राजमुद्रा' काढून टाका असे सांगण्याचा कुणालाच अधिकार नाही. मनसे च्या झेंड्यावर तेव्हाची ' राजमुद्रा' असणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही, मनसेच्या झेंड्यावर 'राजमुद्रा' असणे बेकायदेशीर सुद्धा ठरत नाही.

झेंड्यावर पुन्हा इंजिन येण्याचं 'राज'कारणं

राज ठाकरे यांनी झेंड्यावर पुन्हा इंजिनचं चिन्हं आणण्यामागे दोन कारणं सांगितली जात आहेत. एक म्हणजे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत मनसेला दमदारपणे उतरायचं आहे. त्यासाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशावेळी सभा, मेळावे घेताना पक्षाचं चिन्हंही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. किंबहुना हे चिन्हं लोकांच्या नजरेसमोर सतत असले पाहिजे त्यासाठी मनसेने झेंड्यावर रेल्वे इंजिनचं चिन्हं घेतल्याचं सांगितलं जात आहे. झेंड्यावर पक्षाचं चिन्हं घेतल्याने मतदारांच्या मनावर चिन्हं कोरलं जातं. कोणत्या पक्षाला वाढायचं असेल तर त्याचा झेंडा, चिन्हं आणि विचारधारा मतदारांपर्यंत वारंवार गेली पाहिजे. त्यामुळेही हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळेही कदाचित त्यांनी झेंड्यावर इंजिन चिन्हं घेतलं असावं, असं सांगितलं जातंय.

मनसेचा 2020 मध्ये आला नवीन झेडा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेने 2020 मध्ये महाअधिवेशन आयोजित केलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. याच अधिवेशनापासून राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका घेत मनसेच्या भगव्या झेंड्यांचं अनावरण केलं होतं. त्यावर रेल्वे इंजिन ऐवजी राजमुद्रा घेतली होती. त्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलं होतं. राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही प्रशासकीय मुद्रा आपल्या झेंड्यावर घेतली होती. त्यावेळी त्यांनी झेंड्याचं पावित्र्य जपण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र, अवघ्या दोन वर्षातच मनसेने झेंडा बदलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबाद