शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज्यात तब्बल दहा जिल्ह्यांत पावसाची तूट; विदर्भात निम्म्या जिल्ह्यांत कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 1:24 AM

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आतापर्यंत चांगला पाऊस

पुणे : नेहमीपेक्षा काही दिवस आधी महाराष्ट्र व्यापलेल्या मान्सूनने नेहमी दुष्काळाची छाया असलेल्या मराठवाड्यावर यंदा चांगली कृपादृष्टी केली असली तरी विदर्भावर त्याची वक्रदृष्टी झाली आहे़ विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ६ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे़ मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

राज्यात यंदा पाऊस थोडा उशिरा आला असला तरी त्याने १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता़ सुरुवातीच्या काही दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली़ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्या जिल्ह्यात यंदा जोरदार वृष्टी झाली आहे.

 कोकणातही सातत्याने पाऊस पडत आहे़ त्यामुळे यंदा कोरोनाचे सावट असतानाही वेळेवर पेरण्या झाल्या आहेत़ त्याचवेळी विदर्भाकडे मात्र मान्सूनने पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे़ विदर्भात सरासरीपेक्षा ५ टक्के कमी पाऊस झाला आहे़ त्यात ६ जिल्ह्यांत खूप कमी पाऊस झाल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता राज्यात १९ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ त्याचवेळी कोकणात २१ टक्के, मध्य महाराष्ट्रात २० टक्के आणि मराठवाड्यात ४७ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

कमी पाऊस झालेले जिल्हेगोंदिया (-३८), नंदुरबार (-२६), पालघर (-१७), यवतमाळ व गडचिरोली (-१५), सातारा (-१४), अकोला (-१३), भंडारा(-११), चंद्रपूर (-१), ठाणे (-२)

सर्वसाधारण पाऊस झालेले जिल्हे : रायगड (सरासरीइतका), नाशिक (६), नागपूर, वर्धा (२), अमरावती (४)

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे : मुंबई शहर (४०), रत्नागिरी (२७), सिंधुदुर्ग (५७), मुंबई उपनगर (५९), धुळे (२२), जळगाव (४३), कोल्हापूर १०), पुणे (१४), सांगली (२१), हिंगोली (१९), जालना (५१), लातूर (५०), नांदेड (१५), बुलढाणा (२३), वाशिम (३२) सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झालेले जिल्हे : अहमदनगर (७९), सोलापूर (६९), औरंगाबाद (८१), बीड (७७).

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईPuneपुणे