शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने १२ गुंठे वांग्याचे पीक उपटले; ९५ किलो वांग्याला अवघे ६६ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 20:32 IST

तीन महिने कष्ट करून काढलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

सासवड : कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील शेतकरी ऋषी नानासाहेब तिवटे यांनी १२ गुंठे क्षेत्रात वांग्याची रोपे लागवड केली होती. त्यासाठी त्यांना अंदाजे ५० हजार रुपये इतका खर्च आला होता. वांग्याचा पहिला तोडा केला. तेव्हा १००० रुपये मिळाले होते.

दुसरा तोडा केल्यानंतर पुण्यातल्या गुलटेकडी येथील बाजारात वांगी विक्रीसाठी आणली होती. मात्र ९५ किलो वांगी आणूनही शेतकऱ्याच्या हाती अवघे ६६ रुपये पडले. त्यामुळे नैराश्येतून या शेतकऱ्याने १२ गुंठे शेतातील वांग्याचे पीक उपटून टाकले. तीन महिने कष्ट करून काढलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावेळी वांग्याला तीन रुपये प्रतिकिलो दर मिळाला. ९५ किलो वांग्यांचे एकूण २८५ रूपये झाले. यामधून १७ रुपये ५० पैसे हमाली गेली, ४ रूपये ७५ पैसे तोलाई दिली. ६ रूपये ७५ पैसे भराई तर १९० रूपये वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्याला ६६ रूपये इतकी रक्कम हातात आली. बाजारभाव नसल्याने व भांडवली खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

''वीज समस्या, बाजारभाव, वाहतूक, दलाल, आडते या सर्व समस्यांना तोंड देत शेतकरी भाजीपाला पिकवतात. तोडणी केल्यानंतर हा भाजीपाला बाजारात लगेच न्यावा लागतो. काही तासात तो विकला नाही तर तो खराब होतो. बाजारात माल पोहोचला नाही तर झाडावरून तोड करून तो माल फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातच बाजारभाव नसला की उत्पादकांना नुकसानीशिवाय हाती काही लागत नाही. - ऋषी तिवटे, वांगी उत्पादक शेतकरी''

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरFarmerशेतकरीvegetableभाज्याMONEYपैसाGovernmentसरकार