शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पुरंदरचे विमानतळ होणारच, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:31 IST

पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादन होऊ घातलेल्या सात गावांमधील नागरिकांचा विरोध

पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा पुढील शंभर वर्षांचा विकास करायचा असल्यास पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ करावेच लागणार आहे. त्यासाठी आता नाइलाज आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही पद्धतीने केले जाणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला योग्य पद्धतीने दिला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादन होऊ घातलेल्या सात गावांमधील नागरिकांनी विरोध म्हणून सासवड येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात पवार यांना विचारले असता, विमानतळ ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची अत्यंत निकडीची गरज बनली आहे. पुण्यातील अनेक आयटी तसेच अन्य मोठ्या कंपन्या चेन्नई आणि बंगळुरू शहरात स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे. हे थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे अतिशय गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सध्याच्या विमानतळाची जागा ही दहा वर्षांपूर्वीच निश्चित झालेली आहे. विमानतळाच्या जागा बदलासंदर्भात यापूर्वी बारामतीतील दोन गावांचा विचार झाला होता. मात्र, त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. आता हीच जागा अंतिम झाली आहे. या भूसंपादनात शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केले जाणार नाही. ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाप्रमाणेच हे भूसंपादन देखील केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचा तसेच घरांचा योग्य मोबदला दिला जाईल. त्यांनी या पैशातून अन्यत्र चांगल्या जमिनी घ्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांची सध्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात आहे. या लोकसंख्येसाठी नवीन विमानतळाची गरज आहे. सध्याचे लोहगाव येथील विमानतळ हे लष्कराचे असून, त्याच्या विस्तारासंदर्भात अनेक बंधने येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका राज्य सरकारची मुळीच नाही. पुढील शंभर वर्षांचा विचार करता शहराला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हिताची खबरदारी राज्य सरकार निश्चित घेईल.

‘पीएमआरडीए’च्या रद्द झालेल्या आराखड्यासंदर्भात ते म्हणाले, याविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर चुकीची आरक्षणे टाकण्यात आली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यात जर चुकीचे असेल तर ते दुरुस्त करणे राज्य सरकारचे काम आहे, असे मी सुचविले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा आराखडा रद्द करत असल्याचे सांगून नवीन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळAjit Pawarअजित पवारPurandarपुरंदर