शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पुरंदरचे विमानतळ होणारच, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:31 IST

पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादन होऊ घातलेल्या सात गावांमधील नागरिकांचा विरोध

पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा पुढील शंभर वर्षांचा विकास करायचा असल्यास पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ करावेच लागणार आहे. त्यासाठी आता नाइलाज आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही पद्धतीने केले जाणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला योग्य पद्धतीने दिला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादन होऊ घातलेल्या सात गावांमधील नागरिकांनी विरोध म्हणून सासवड येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात पवार यांना विचारले असता, विमानतळ ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची अत्यंत निकडीची गरज बनली आहे. पुण्यातील अनेक आयटी तसेच अन्य मोठ्या कंपन्या चेन्नई आणि बंगळुरू शहरात स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे. हे थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे अतिशय गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सध्याच्या विमानतळाची जागा ही दहा वर्षांपूर्वीच निश्चित झालेली आहे. विमानतळाच्या जागा बदलासंदर्भात यापूर्वी बारामतीतील दोन गावांचा विचार झाला होता. मात्र, त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. आता हीच जागा अंतिम झाली आहे. या भूसंपादनात शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केले जाणार नाही. ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाप्रमाणेच हे भूसंपादन देखील केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचा तसेच घरांचा योग्य मोबदला दिला जाईल. त्यांनी या पैशातून अन्यत्र चांगल्या जमिनी घ्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांची सध्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात आहे. या लोकसंख्येसाठी नवीन विमानतळाची गरज आहे. सध्याचे लोहगाव येथील विमानतळ हे लष्कराचे असून, त्याच्या विस्तारासंदर्भात अनेक बंधने येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका राज्य सरकारची मुळीच नाही. पुढील शंभर वर्षांचा विचार करता शहराला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हिताची खबरदारी राज्य सरकार निश्चित घेईल.

‘पीएमआरडीए’च्या रद्द झालेल्या आराखड्यासंदर्भात ते म्हणाले, याविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर चुकीची आरक्षणे टाकण्यात आली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यात जर चुकीचे असेल तर ते दुरुस्त करणे राज्य सरकारचे काम आहे, असे मी सुचविले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा आराखडा रद्द करत असल्याचे सांगून नवीन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळAjit Pawarअजित पवारPurandarपुरंदर