शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले; सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचे तोंडावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:04 IST

महापालिका सभेत पाण्याऐवजी मराठा आरक्षण अभिनंदन व पाच राज्यांच्या निकालाचे गोडवे

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्र्राधिकरणाच्या निकालामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतु पुणेकरांच्या हिताचा विचार करण्यासाठी निवडून दिलेल्या सदस्यांना याबाबत काही पडले नसून, शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या पाणीकपातीबाबत ब्र शब्ददेखील काढला नाही. सत्ताधाºयांनी मराठा आरक्षण जाहीर केल्याने मुख्यमंत्र्याचा अभिनंदनाचा ठराव मांडून पाण्याच्या प्रश्नाला बगल दिली. तर पाण्याच्या प्रश्नाऐवजी नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे अभिनंदन व कौतुक करण्यातच विरोधकांनी अधिक रस दाखवला. पुण्याच्या पाणीप्रश्नावर आयुक्त सौरभ राव यांनी कोरडे निवेदन करून सभा तहकूब करण्यात आली.पुणे शहराच्या पाणीवापराबाबत गुरुवारी (दि. १३) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेने दाखल केलेले अपील फेटाळून लावले. यामुळे पुणे शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येच्या आधारे ११५० एमएलडी पाणीपुरवठा मान्य करण्याऐवजी दररोज केवळ निम्माच म्हणजे ६३५ एमएलडीच पाणी देण्याचा निर्णय प्राधिकरणाने दिला. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे खरे तर शहरासमोर गंभीर पाणीसंकट उभे राहिले आहे.याबाबत त्वरित तोडगा न काढल्यास येत्या काही दिवसांत पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. यामुळे प्राधिकरणाचा निर्णय झाल्यानंतर दुसºयाच दिवशी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध व सत्ताधाºयांकडून याबाबत साधक-बाधक चर्चा होऊन गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही तरी चर्चा होईल अशी अपेक्षा पुणेकरांना होती. परंतु सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकाकडून केवळ नावापुरता पाण्याचा प्रश्न मांडण्यात आला. यावर आयुक्त सौरभ राव यांनीदेखील केवळ वरवरचे निवेदन केले आणि विरोधक गप्प बसले. महापालिकेत प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधाºयांना एरवी एखाद्या प्रश्नामध्ये खिंडीत पकडण्याची एकही संधी न सोडणाºया विरोधकांकडून शुक्रवारी पाण्याच्या प्रश्नावर आयुक्तांच्या निवेदनानंतर ब्र शब्द देखील निघाला नाही.दोन दिवसांत अपील दाखल करणारपुणे शहराचा पाण्याचा कोटा ठरविण्यासाठी शहराची सर्व लोकसंख्या, पाण्याची गरज, समाविष्ट गावांतील लोकसंख्या, हद्दीलगतची पाच किलोमीटरपर्यंतची गावे, मोठ्या संस्था व सोसायट्या, कटक मंडळे, तरंगती लोकसंख्या याचा विचार झालेला नाही. पुण्याला प्रतिदिन १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कलम ३१ ब प्रमाणे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यासाठी राज्य सरकारकडे दाद मागणार आहोत. यासंदर्भात शहराची लोकसंख्या व पाण्याची निकड लक्षात घेत दोन दिवसांत प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे दाखल केला जाईल, असे स्पष्टीकरण पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (दि. १४) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केले.पक्षनेत्यांची बैठकदेखील कोरडीचमहाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या निर्णयानंतर शहरात गंभीर पाणीप्रश्न निर्माण झाला असून, याबाबत शुक्रवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले होते.परंतु शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता महापौरांच्या कार्यालयात झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीतदेखील पुण्याच्या पाणीप्रश्नावर एकाही पक्षाच्या गटनेत्यांनी एका शब्दाने देखील महापौरांना विचारले नाही. यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न पेटला असताना पक्षनेत्यांची बैठकदेखील कोरडीच झाली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई