शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पुण्यातील तरुणाचा अहमदनगरमध्ये खून; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:42 AM

प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.शेखर पाचवे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. २३) कोथरुडमधून त्याचे अपहरण करण्यात आले. तर अहमदनगर येथील कर्जत या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोन अल्पवयीन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. मृत शेखर विवाहित असून त्यास दोन मुले आहेत. परंतु, तरीही आरोपीच्या नातेवाईक मुलीसोबत त्याचे संबध होते. या वरून वाद झाल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी मृत शेखर घरगुती कामानिमित्त कोथरुड परिसरात आला होता. त्यावेळी आरोपी त्याला समजून सांगण्यासाठी गेले ह़ोते, मात्र त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. आरोपींनी त्याला मारहाण करत चारचाकीमध्ये बसवत अपहरण केले. नगर जिल्ह्यतील कर्जत या गावी घेऊन जाऊन त्याचा निर्घृण खून केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस