शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pune Wall Collapse :तो शेजारच्या खोलीत झोपला आणि होत्याचं नव्हतं झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:00 IST

१५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं. 

पुणे : पावसाचा जोर बघून भावाला मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं होतं पण त्याने ते ऐकलं नाही आणि मला दिसला तो त्याचा मृतदेहचं...एक -दोन नाही तर तब्बल १५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं. 

ते म्हणाले, 'आम्ही सगळे बिहार मधल्या काठीया जिल्ह्याचे. आमच्याकडे गावातले सगळेजण एकेका गटाने कामासाठी बाहेर पडतात. आमच्या गटात आम्ही आणि शेजारच्या गावातील लोक होते. आम्ही ३५ जण गेल्या अडीच महिन्यापासून इथे काम करतो. पण या कामाचा शेवट 'असा' होईल असं चुकूनही वाटलं नव्हतं. 

पुढे ते म्हणाले, 'मी रात्री भावाला पावसाचा जोर बघून म्हटलं तू माझ्याच खोलीत झोप. पण त्याने ते ऐकलं नाही आणि अपघातानंतर त्याचा मेंदू बाहेर आलेल्या रूपातलं अंतिम दर्शनच मला झालं. आमच्या पत्र्याच्या खोल्यांवर पावसाचा मोठा आवाज होत असल्याने मला रात्री जाग आली होती. पण पुन्हा प्रयत्न करून एकाच्या सुमारास मी झोपलो आणि जोरात आवाज झाला. तो आवाज इतका मोठा होता की मला वाटलं सगळी बिल्डिंग माझ्या अंगावर कोसळली. डोळे उघडून बघतो तर माझ्या कंबरेखालचा भाग मातीखाली होता आणि पत्रे तुटून मी झाडाच्या खाली होतो. आजूबाजूला काहीवेळ बचाव-बचाव आवाज येत होते. पण काही वेळात ते क्षीण झाले आणि दुर्दैवाने मी एकटाच आजचा सूर्य बघू शकलो. 

एक मोठा  उसासा टाकून ते म्हणाले, 'गेलेले सारे माझे नातेवाईक होते. कोणी मावस तर कोणी मामेभाऊ, कोणी भाचे तर कोणी पुतणे. ज्यांच्यासोबत पुण्यात आलो तिथून जाताना आता त्यांचे मृतदेह घेऊन जायचे आहेत. कोणाला काय सांगू आणि घरच्यांना काय उत्तरं देऊ काहीच कळत नाही. आता डोळ्यासमोर अंधार आहे, आयुष्यातल्या सर्वात वाईट आठवणींनी भरलेला आजचा दिवस वाटत आहे. 

ती किलबील कायमची थांबली 

या अपघातात चार लहान मुलांनाही जीव गमवावा लागला आहे.त्यांची आठवण काढताना विमल म्हणाले, ' ती मुले आमचं काम सुरु असताना आजूबाजूला खेळत असत. त्यांचा तो किलबिलाट कानात साठून राहिलाय. अजूनही हाक मारतात असा भास होतो. आता तो किलबिलाट थांबलाय. अगदी कायमचाच...'

टॅग्स :KondhvaकोंढवाRainपाऊसAccidentअपघातDeathमृत्यू