शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Pune Wall Collapse :तो शेजारच्या खोलीत झोपला आणि होत्याचं नव्हतं झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:00 IST

१५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं. 

पुणे : पावसाचा जोर बघून भावाला मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं होतं पण त्याने ते ऐकलं नाही आणि मला दिसला तो त्याचा मृतदेहचं...एक -दोन नाही तर तब्बल १५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं. 

ते म्हणाले, 'आम्ही सगळे बिहार मधल्या काठीया जिल्ह्याचे. आमच्याकडे गावातले सगळेजण एकेका गटाने कामासाठी बाहेर पडतात. आमच्या गटात आम्ही आणि शेजारच्या गावातील लोक होते. आम्ही ३५ जण गेल्या अडीच महिन्यापासून इथे काम करतो. पण या कामाचा शेवट 'असा' होईल असं चुकूनही वाटलं नव्हतं. 

पुढे ते म्हणाले, 'मी रात्री भावाला पावसाचा जोर बघून म्हटलं तू माझ्याच खोलीत झोप. पण त्याने ते ऐकलं नाही आणि अपघातानंतर त्याचा मेंदू बाहेर आलेल्या रूपातलं अंतिम दर्शनच मला झालं. आमच्या पत्र्याच्या खोल्यांवर पावसाचा मोठा आवाज होत असल्याने मला रात्री जाग आली होती. पण पुन्हा प्रयत्न करून एकाच्या सुमारास मी झोपलो आणि जोरात आवाज झाला. तो आवाज इतका मोठा होता की मला वाटलं सगळी बिल्डिंग माझ्या अंगावर कोसळली. डोळे उघडून बघतो तर माझ्या कंबरेखालचा भाग मातीखाली होता आणि पत्रे तुटून मी झाडाच्या खाली होतो. आजूबाजूला काहीवेळ बचाव-बचाव आवाज येत होते. पण काही वेळात ते क्षीण झाले आणि दुर्दैवाने मी एकटाच आजचा सूर्य बघू शकलो. 

एक मोठा  उसासा टाकून ते म्हणाले, 'गेलेले सारे माझे नातेवाईक होते. कोणी मावस तर कोणी मामेभाऊ, कोणी भाचे तर कोणी पुतणे. ज्यांच्यासोबत पुण्यात आलो तिथून जाताना आता त्यांचे मृतदेह घेऊन जायचे आहेत. कोणाला काय सांगू आणि घरच्यांना काय उत्तरं देऊ काहीच कळत नाही. आता डोळ्यासमोर अंधार आहे, आयुष्यातल्या सर्वात वाईट आठवणींनी भरलेला आजचा दिवस वाटत आहे. 

ती किलबील कायमची थांबली 

या अपघातात चार लहान मुलांनाही जीव गमवावा लागला आहे.त्यांची आठवण काढताना विमल म्हणाले, ' ती मुले आमचं काम सुरु असताना आजूबाजूला खेळत असत. त्यांचा तो किलबिलाट कानात साठून राहिलाय. अजूनही हाक मारतात असा भास होतो. आता तो किलबिलाट थांबलाय. अगदी कायमचाच...'

टॅग्स :KondhvaकोंढवाRainपाऊसAccidentअपघातDeathमृत्यू