शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल: नियोजन नव्हते तर पूल पाडायची घाई का केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 11:29 IST

दीड वर्ष होत आले वाहनचालकाबरोबर स्थानिकांनाही त्रास; आणखी किती वर्षे नरकयातना सहन करायच्या ?

-अभिजित कोळपे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर लगेचच नवीन दुमजली पुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. परंतु, दीड वर्ष होत आले तरी कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे मात्र, वाहनचालक, स्थानिक नागरिकांना नाहक नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नियोजनच केले नव्हते तर मग पूल पाडायची घाई का केली, असा संतप्त सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे.

कोरोना महामारीमुळे एप्रिल-मे २०२० या दरम्यान लॉकडाऊनमध्ये पूल पाडण्यात आला होता. हा उड्डाणपूल पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी पाडून तेथे एकाच खांबावर दुमजली पूल बांधायची घोषणा केली होती. दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी आणि वरून मेट्रो धावणार असे देखील जाहीर केले होते. लॉकडाऊन असल्याने वाहतूककोंडी होणार नाही. त्यासाठी तात्काळ पूल पाडायला सुरुवात केली. त्यानंतर पीएमआरडीएकडून पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, दीड वर्ष होत आले तरी काहीच हालचाली होत नाही. त्याठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड लावण्यात आले आहेत. त्यापुढे काहीच काम अद्याप झाले नाही.भूमिपूजन होऊन तीन वर्षे झाली मेट्रोचे काम रेंगाळलेलेचडिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेवाडी येथे मेट्रोचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी ते म्हटले की पुढील तीन वर्षात मेट्रो पुणेकरांसाठी प्रत्यक्ष ट्रॅकवर महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि कात्रज ते निगडी मार्गावरील या दोन मेट्रोबरोबर धावेल. सध्या महामेट्रोच्या या दोन मार्गांचे जवळपास ७० टक्के काम होऊनही तांत्रिक (ट्रायल रन) चाचणी घेण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोसाठी पीएमआरडीए किंवा केंद्र, राज्य सरकार एकही रुपया टाकणार नाही. तर टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या भागीदारीत ८ हजार ३०० कोटी रुपये स्वतः खर्च करून मेट्रोचे काम करणार आहे. मात्र, तीन वर्षे होऊन गेली तरी अद्याप मेट्रोचा एकही खांब उभा राहिला नाही. बाणेर-बालेवाडी परिसरातील रस्त्यावर फक्त बॅरिकेड लावण्यात आले आहेत. याबाबत पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे दीड वर्ष गेले. त्यानंतर मेट्रो यार्ड, कार शेडची जागेचे भूसंपादन करणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्याच्या परवानग्या मिळवण्यासाठी लागले आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होईल.प्रशासन नेमकं करतंय काय ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठ चौकातील पूल पाडून तेथे लगेच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, या पुलाचा आराखडा अजून तयार झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. दीड वर्षात जर प्रशासन आराखडाही तयार करत नसेल तर मग प्रशासन नक्की काय काम करत आहे, असा सवाल उपस्थित होतो.  उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारायला हवा. पीएमआरडीए जर हा पूल मेट्रो बरोबर बांधणार असेल तर हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर अद्याप एकही खांब उभारलेल्या नाही. आता जरी काम सुरू केले तरी पुढे तीन वर्षे लागणार आहे. मग विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करायची आहे, असा प्रश्न शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीधर गलांडे यांनी उपस्थित केला आहे.

रोज दोन-तीन किलोमीटरची कोंडी नित्याचीच

औंध, बाणेर आणि पाषाणकडून येणाऱ्या वाहनचालकांना रोज दोन-तीन किलोमीटर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या बाजुने येणाऱ्या वाहनांना सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी पूर्वी तंत्र शिक्षण महाविद्यालय चौकातून वळून जाता येत होते. आता बॅरिकेड लावून हा चौक बंध केल्याने दोन किलोमीटर खाली येऊन कृषी महाविद्यालय (म्हसोबा गेट) चौकातून वाहनचालकांना वळून जावे लागत आहे. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या बाबींची दखल घ्यायला हवी.- प्रमोद देवकर-पाटील, अध्यक्ष, कर्तव्य जनमंच 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठMetroमेट्रोAjit Pawarअजित पवारpimpri-acपिंपरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAundhऔंध