शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल: नियोजन नव्हते तर पूल पाडायची घाई का केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 11:29 IST

दीड वर्ष होत आले वाहनचालकाबरोबर स्थानिकांनाही त्रास; आणखी किती वर्षे नरकयातना सहन करायच्या ?

-अभिजित कोळपे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर लगेचच नवीन दुमजली पुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. परंतु, दीड वर्ष होत आले तरी कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे मात्र, वाहनचालक, स्थानिक नागरिकांना नाहक नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नियोजनच केले नव्हते तर मग पूल पाडायची घाई का केली, असा संतप्त सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे.

कोरोना महामारीमुळे एप्रिल-मे २०२० या दरम्यान लॉकडाऊनमध्ये पूल पाडण्यात आला होता. हा उड्डाणपूल पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी पाडून तेथे एकाच खांबावर दुमजली पूल बांधायची घोषणा केली होती. दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी आणि वरून मेट्रो धावणार असे देखील जाहीर केले होते. लॉकडाऊन असल्याने वाहतूककोंडी होणार नाही. त्यासाठी तात्काळ पूल पाडायला सुरुवात केली. त्यानंतर पीएमआरडीएकडून पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, दीड वर्ष होत आले तरी काहीच हालचाली होत नाही. त्याठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड लावण्यात आले आहेत. त्यापुढे काहीच काम अद्याप झाले नाही.भूमिपूजन होऊन तीन वर्षे झाली मेट्रोचे काम रेंगाळलेलेचडिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेवाडी येथे मेट्रोचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी ते म्हटले की पुढील तीन वर्षात मेट्रो पुणेकरांसाठी प्रत्यक्ष ट्रॅकवर महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि कात्रज ते निगडी मार्गावरील या दोन मेट्रोबरोबर धावेल. सध्या महामेट्रोच्या या दोन मार्गांचे जवळपास ७० टक्के काम होऊनही तांत्रिक (ट्रायल रन) चाचणी घेण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोसाठी पीएमआरडीए किंवा केंद्र, राज्य सरकार एकही रुपया टाकणार नाही. तर टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या भागीदारीत ८ हजार ३०० कोटी रुपये स्वतः खर्च करून मेट्रोचे काम करणार आहे. मात्र, तीन वर्षे होऊन गेली तरी अद्याप मेट्रोचा एकही खांब उभा राहिला नाही. बाणेर-बालेवाडी परिसरातील रस्त्यावर फक्त बॅरिकेड लावण्यात आले आहेत. याबाबत पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे दीड वर्ष गेले. त्यानंतर मेट्रो यार्ड, कार शेडची जागेचे भूसंपादन करणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्याच्या परवानग्या मिळवण्यासाठी लागले आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होईल.प्रशासन नेमकं करतंय काय ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठ चौकातील पूल पाडून तेथे लगेच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, या पुलाचा आराखडा अजून तयार झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. दीड वर्षात जर प्रशासन आराखडाही तयार करत नसेल तर मग प्रशासन नक्की काय काम करत आहे, असा सवाल उपस्थित होतो.  उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारायला हवा. पीएमआरडीए जर हा पूल मेट्रो बरोबर बांधणार असेल तर हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर अद्याप एकही खांब उभारलेल्या नाही. आता जरी काम सुरू केले तरी पुढे तीन वर्षे लागणार आहे. मग विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करायची आहे, असा प्रश्न शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीधर गलांडे यांनी उपस्थित केला आहे.

रोज दोन-तीन किलोमीटरची कोंडी नित्याचीच

औंध, बाणेर आणि पाषाणकडून येणाऱ्या वाहनचालकांना रोज दोन-तीन किलोमीटर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या बाजुने येणाऱ्या वाहनांना सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी पूर्वी तंत्र शिक्षण महाविद्यालय चौकातून वळून जाता येत होते. आता बॅरिकेड लावून हा चौक बंध केल्याने दोन किलोमीटर खाली येऊन कृषी महाविद्यालय (म्हसोबा गेट) चौकातून वाहनचालकांना वळून जावे लागत आहे. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या बाबींची दखल घ्यायला हवी.- प्रमोद देवकर-पाटील, अध्यक्ष, कर्तव्य जनमंच 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठMetroमेट्रोAjit Pawarअजित पवारpimpri-acपिंपरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAundhऔंध