शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:11 IST

- किमान १४० दिवस गाळप सुरू असल्यासच साखर कारखान्याचे अर्थकारण टिकू शकेल; यंदा ८० लाख टन साखर उत्पादन

पुणे :उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह संपूर्ण देशाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंतच चालेल. तर उत्तर प्रदेशातील धुराडी एप्रिल मध्यापर्यंत बंद होतील. सुमारे २०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात यंदाचा गाळप हंगाम सरासरी ८३ दिवसच चालला आहे. कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकते. यंदा ८३ दिवसांच्या हंगामातून केवळ ८० लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या खर्चाच्या तुलनेत ८३ दिवसांचा हंगाम याचे गणित बसवणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

देशातील २०२४-२५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ८० टक्के साखर उत्पादन होणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतील उभ्या उसाची अवस्था आणि त्यातून होणाऱ्या अपेक्षित घटत्या साखर उत्पादनाची आकडेवारी याविषयी प्रमुख आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रीय पातळीवरील एका साखर कारखाना संघटनेने यंदा देशात ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्र सरकारला दिला. त्यानुसार केंद्र सरकारने धोरण निश्चित करून २० लाख टन साखर निर्यातीच्या मागणीनुसार, पहिल्या टप्प्यात १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. यामुळे साखर दर सुधारण्यास निश्चित मदत झाली. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार देशात केवळ २५९ लाख टन साखर उत्पादन होऊ शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली.

यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाला विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे साखर उतारा घटला. निवडणुकांमुळे महाराष्ट्र, कर्नाटकात नवा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. दोन्ही राज्यांतील गाळप १५ ऑक्टोबरला सुरू झाले असते, तर यापेक्षा भयानक परिस्थिती समोर आली असती, असेही ते म्हणाले.

महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मते गतवर्षी झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाची नवी लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. प्रमुख जलाशयांतील पाण्याच्या साठ्यामुळे यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. त्यातच ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि त्या पाठोपाठ भारतीय हवामान खात्याने यंदाचे भारतातील पाऊसमान समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे घडल्यास उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेUttar Pradeshउत्तर प्रदेशfoodअन्न