शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:11 IST

- किमान १४० दिवस गाळप सुरू असल्यासच साखर कारखान्याचे अर्थकारण टिकू शकेल; यंदा ८० लाख टन साखर उत्पादन

पुणे :उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह संपूर्ण देशाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंतच चालेल. तर उत्तर प्रदेशातील धुराडी एप्रिल मध्यापर्यंत बंद होतील. सुमारे २०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात यंदाचा गाळप हंगाम सरासरी ८३ दिवसच चालला आहे. कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकते. यंदा ८३ दिवसांच्या हंगामातून केवळ ८० लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या खर्चाच्या तुलनेत ८३ दिवसांचा हंगाम याचे गणित बसवणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

देशातील २०२४-२५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ८० टक्के साखर उत्पादन होणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतील उभ्या उसाची अवस्था आणि त्यातून होणाऱ्या अपेक्षित घटत्या साखर उत्पादनाची आकडेवारी याविषयी प्रमुख आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रीय पातळीवरील एका साखर कारखाना संघटनेने यंदा देशात ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्र सरकारला दिला. त्यानुसार केंद्र सरकारने धोरण निश्चित करून २० लाख टन साखर निर्यातीच्या मागणीनुसार, पहिल्या टप्प्यात १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. यामुळे साखर दर सुधारण्यास निश्चित मदत झाली. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार देशात केवळ २५९ लाख टन साखर उत्पादन होऊ शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली.

यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाला विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे साखर उतारा घटला. निवडणुकांमुळे महाराष्ट्र, कर्नाटकात नवा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. दोन्ही राज्यांतील गाळप १५ ऑक्टोबरला सुरू झाले असते, तर यापेक्षा भयानक परिस्थिती समोर आली असती, असेही ते म्हणाले.

महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मते गतवर्षी झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाची नवी लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. प्रमुख जलाशयांतील पाण्याच्या साठ्यामुळे यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. त्यातच ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि त्या पाठोपाठ भारतीय हवामान खात्याने यंदाचे भारतातील पाऊसमान समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे घडल्यास उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेUttar Pradeshउत्तर प्रदेशfoodअन्न