शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:11 IST

- किमान १४० दिवस गाळप सुरू असल्यासच साखर कारखान्याचे अर्थकारण टिकू शकेल; यंदा ८० लाख टन साखर उत्पादन

पुणे :उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह संपूर्ण देशाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंतच चालेल. तर उत्तर प्रदेशातील धुराडी एप्रिल मध्यापर्यंत बंद होतील. सुमारे २०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात यंदाचा गाळप हंगाम सरासरी ८३ दिवसच चालला आहे. कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकते. यंदा ८३ दिवसांच्या हंगामातून केवळ ८० लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या खर्चाच्या तुलनेत ८३ दिवसांचा हंगाम याचे गणित बसवणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

देशातील २०२४-२५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ८० टक्के साखर उत्पादन होणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतील उभ्या उसाची अवस्था आणि त्यातून होणाऱ्या अपेक्षित घटत्या साखर उत्पादनाची आकडेवारी याविषयी प्रमुख आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रीय पातळीवरील एका साखर कारखाना संघटनेने यंदा देशात ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्र सरकारला दिला. त्यानुसार केंद्र सरकारने धोरण निश्चित करून २० लाख टन साखर निर्यातीच्या मागणीनुसार, पहिल्या टप्प्यात १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. यामुळे साखर दर सुधारण्यास निश्चित मदत झाली. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार देशात केवळ २५९ लाख टन साखर उत्पादन होऊ शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली.

यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाला विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे साखर उतारा घटला. निवडणुकांमुळे महाराष्ट्र, कर्नाटकात नवा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. दोन्ही राज्यांतील गाळप १५ ऑक्टोबरला सुरू झाले असते, तर यापेक्षा भयानक परिस्थिती समोर आली असती, असेही ते म्हणाले.

महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मते गतवर्षी झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाची नवी लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. प्रमुख जलाशयांतील पाण्याच्या साठ्यामुळे यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. त्यातच ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि त्या पाठोपाठ भारतीय हवामान खात्याने यंदाचे भारतातील पाऊसमान समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे घडल्यास उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेUttar Pradeshउत्तर प्रदेशfoodअन्न