शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुणे-सोलापूर महामार्ग : टोलवसुली पट्ट्यात दिशादर्शकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 2:33 AM

पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

उरुळी कांचन - पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.रस्ता दुभाजक उंची कमी झाली आहे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत, दिशादर्शक फलक सुस्थितीत नाहीत, अंतराचे फलक काही ठिकाणी नाहीत तर काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे, गावांच्या नावांचे फलक योग्य त्या मोठ्या आकाराचे व नेमक्या ठिकाणी नाहीत, सर्व्हिस रस्ते वाहतुकीसाठी नाहीतच त्यावर सगळीकडे अतिक्रमण झाले आहे. ते दूर करून उपयोगात आणणे, मुख्य रस्ता व सर्व्हिस रस्ता यामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणच्या लोखंडी जाळ्या तुटल्यात किंवा चोरून नेल्या आहेत.त्या परत बसविणे यांसारख्या जबाबदाºया टाळणे, धोक्याच्या किंवा अपघातप्रवण क्षेत्रात काही अतिरिक्त सूचनाफलक किंवा हायमास्ट दिवे लावणे, तसेच वेगनियंत्रण करण्यासाठी लालरंगाच्या दिव्यांची व्यवस्था, अशा व अनेक सोयीसुविधा पुरवणे हे या कंपनीने करणे निविदा-शर्तींनुुसार अपेक्षित असताना याकडे या कंपनीने तब्बल१४ वर्षे झाली पूर्णपणे डोळेझाक केलेली आहे.फक्त टोलवसुली हेच आपले काम, अशा पद्धतीने त्यांचे काम जोरात सुरू आहे. कंपनीच्या टोलवसुलीची मुदत फक्त दोन वर्षे बाकी असताना ते आता काय लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी साईटपट्ट्या ९ इंच ते फुटभर पडलेल्या तर काही ठिकाणी साईटपट्ट्या फुटभर उंच झाल्या आहेत.अपघातप्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा, असा फलक व धोक्याची सूचना देणारा लाल सिग्नल बसविणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्य तत्परता दाखवीत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. संबंधितानी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.शासन व सदरची खासगी कंपनी यांच्यामधील करारानुसार टोलवसुलीपासून ते टोलवसुली संपेपर्यंतच्या कालावधीत या रस्त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.सुविधांपासून वंचित : टोल वसुलीत धन्यताकंपनीने रस्त्याचा संपूर्ण पृष्ठभाग (डांबरीकरणाचा) समपातळीत राखणे, सेवा रस्ता सुस्थितीत ठेवणे व त्यावर अतिक्रमण होऊ न देणे, मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्या वापरायोग्य ठेवणे व त्यांची निगा राखणे, गरजेच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावणे आणि त्याची निगा राखणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे, रस्ता दुभाजाकावरील प्रकाश नियंत्रक सुस्थितीत ठेवणे, महामागार्पासून प्रत्येक गावांचा जोडरस्त्याच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी नियंत्रक दिवे बसविणे, चौकाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रकाशझोताच्या दिव्यांची सोय करणे व गरजेच्यावेळी दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक, अंतराचे फलक, गावांच्या नावांचे फलक व रहदारीसाठी राष्ट्रीय महामार्ग व परिवहन खात्याच्या नियमावली आणि निर्देशानुसार लावले पाहिजेत, असे फलक लावणे व त्यांची निगा ठेवणे हे जनतेच्या सोयीसाठी त्यांना मिळणाºया पैशांतून पुरविण्याची महत्वाची जबाबदारी या कंपनीवर असतानाही सदर कंपनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता फक्त टोलवसुली करण्यातच धन्यता मानत आहे. जनतेला अनेक सुविधांपासून वंचित ठेवत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणेSolapurसोलापूर