शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

पुण्याच्या प्रदुषणातील वाढ चिंताजनक : अमिताभ मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 19:39 IST

पुढच्या पिढीच्या भविष्याचा आपण आज विचार केला नाही तर त्यांचे जगणे अवघड होईल इतक्या वेगाने प्रदुषण वाढते आहे...

ठळक मुद्देपुणे शहराचा पर्यावरण अहवालाचे नुकतेच प्रकाशन

पुणे इंटरनॅशनल सेंटर या संस्थेने काही पर्यावरण प्रेमी संस्थांना एकत्र करून पुणे शहराचा पर्यावरण अहवाल तयार केला. त्याचे नुकतेच प्रकाशन झाले. या टीमचे नेतृत्व करत असलेले संरक्षण तंत्रज्ञ व हरित तंत्रज्ञान सल्लागार पद्मश्री प्रा. अमिताभ मलिक यांच्याशी राजू इनामदार यांनी साधलेला संवाद 

* प्रदुषण सर्वच प्रकाराचे होत असताना ‘कार्बन’ चा वेगळा अहवाल कशासाठी?अमिताभ- प्रुदषणात कार्बनचे प्रदुषण अधिक घातक आहे. ते मानवाची प्रतिकार शक्ती कमी करते. वातावरणातील उष्णता वाढवतो. पाणी कमी करते. जगभरात सगळीकडे हे अनिष्ट परिणाम दिसत आहेत. त्याच्या विरोधात काम करणे गरजेचे असल्याबाबत जगात एकमत झाले आहे. कोणत्याच देशाला असे नाही तर संपुर्ण मानव जातीलाच हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे हे प्रमाण परवडणारे नाही. आपल्याला या गोष्टी लगेच जाणवत नव्हत्या, मात्र आता प्रदुषणाचा वेग इतका वाढला आहे की काही देशांमधील अनेक शहरांना पाण्याचा तुटवडा, उष्णतेमधील वाढ हे ठळकपणे जाणवू लागले आहे. त्यातही भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशाला तर या उष्णतेला तोंड देताच येणार नाही. उष्णता वाढणार, पाणी कमी पडणार, त्यातून दुष्काळ येणार, शेतीत काही पिकणारच नाही. शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात असे होणे म्हणजे संकट येणेच आहे. या संकटाची चाहूल ज्यांना लागली ते एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्याचा असा अहवाल तयार करण्याचे तेच कारण आहे.

* पुणे शहरातील कार्बनचे प्रमाण काय आहे?-- पार्टस पर मिनिट या एककामध्ये कार्बनची पातळी मोजतात. हवेतील कार्बनचे कण श्वासाद्वारे आत जातात त्यावरून ती मोजतात. ती ३०० पेक्षा वर जाऊ नये, गेल्यास चिंताजनक समजतात. पुणे शहरात साधारण २० वर्षांपुर्वी ती २८० होती. आता ४१३ झाली आहे. युनोने ती जागतिक स्तरावर ४१५ मोजली आहे, म्हणजे आपण जगाच्या जवळ चाललो आहोत. जगात कार्बन निर्मितीत भारताचा चौथा क्रमांक आहे. त्यात पुणे इतक्या जवळ गेले आहे. ही स्थिती नक्कीच चांगली नाही तसेच चिंताजनकही आहे.कार्बन फुट प्रिंट म्हणून प्रत्येक व्यक्ती किती कार्बन तयार करते हेही मोजता येते. ती व्यक्ती दिवसभरात वीज, वाहने याचा किती वापर करते यावरून ते मोजतात. सन २०११-१२ मध्ये पुण्यातील हे प्रमाण वार्षिक माणशी १.४६ टन इतके होते. सन २०१७-१८ मध्ये ते १.६४ टन वार्षिक असे झाले आहे. फक्त ५ वर्षात १२ टक्केचा फरक पडला आहे. इतका वेग धोकादायक आहे. 

*  कशामुळे होते असे? विजेचा बेसुमार वापर, वाहनांचा वापर, औद्योगिक क्षेत्राची वाढ यातून हवेतील कार्बन डाय आॅक्साईडचे प्रमाण वाढते. झाडे कार्बन शोषून घेतात, मात्र आपण झाडेही तोडत आहोत. त्यामुळेच पुण्यासारख्या एकेकाळी चांगल्या हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या शहराची हवा आज संपुर्ण खराब झाली आहे. पाऊस कमी झाला, उष्णता वाढली असे आपण जे म्हणतो व गेल्या काही वर्षात पुण्यात जे जाणवते आहे त्याचा हा परिणाम आहे. माणशी एक वाहन आज पुण्यात आहे. गरज नसतानाही वाहनांचा वापर होते. सार्वजनिक प्रवासी वाहतूक चांगली नाही हेही एक कारण त्यामागे आहे. पेट्रोल, डिझेल इतके वापरले जाणे शहरासाठी हानीकारक आहे. यातून हवेतील प्रदुषण वाढते. पुण्यातील हवेने आता धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे शास्त्रशुद्धपणे सिद्ध झाले आहे.

* यातून मार्ग कसा निघेल?-- सकारात्मक असले पाहिजे. पुढच्या पिढीच्या भविष्याचा आपण आज विचार केला नाही तर त्यांचे जगणे अवघड होईल इतक्या वेगाने प्रदुषण वाढते आहे. प्रतिकार शक्ती कमी होणे, निरनिराळे आजार होणे याचे प्रमाण आज बरेच आहे. हा सगळा प्रदुषणाचाच परिणाम आहे. त्यामुळे यावर जनजागृती करणे, प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यातील धोका जास्तीत जास्त नागरिकांसमोर आणणे ही जबाबदारी पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांनी स्विकारली आहे. त्यांना साथ देण्यासाठी नागरिकांनीही आता एकत्र येऊन अशा पद्धतीची कामे केली तर प्रदुषणावर मात करणे शक्य आहे. 

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणenvironmentवातावरणdroughtदुष्काळ