शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:05 IST

आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत.

पुणे: विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार सत्ताधारी पक्षातील आमदारच करत आहेत, ही तक्रार म्हणजे राज्य सरकारमध्ये निधीचा मोठा गफला सुरू असल्याचे दिसते अशी टीका माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी केली.पक्षाने खडकवासला इथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी प्रशिक्षण शिबिरासाठी कदम आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत. तेच नाही तर असे अनेक नाराज आमदार तिथे आहेत. सरकार सांगते आहे की अंदापत्रकात तरतुद केली आहे, मात्र तरतुद केली याचा अर्थ पैसे दिले असा होत नाही. त्यामुळेच हे पैसे मग जातात कुठे असा प्रश्न निर्माण होतो.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रशासक आहेत. लोकप्रतिनिधी नाहीतच. पैसे येतात किती, जातात किती, कोणती कामे होतात याची सगळी माहिती फक्त प्रशासकाला असते. ते सरकारचे ऐकत असतात. यातून निधीचा मोठा गफला होत असल्याचा संशय निर्माण होतो असे कदम म्हणाले.विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण महाराष्ट्रातील स्थिती अवघड झाली आहे. प्रमूख रस्ते, जोड रस्ते खराब झाले आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही ते दुरूस्त होत नाहीत. निधी येतोय, मिळेल असेच सांगण्यात येते अशी माहिती कदम यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसBJPभाजपा