शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक विमा योजनेत सहभागासाठी सव्वातीन लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:22 IST

- ज्वारीसाठी शेवटचे दोन दिवस, कांदा, गहू, हरभऱ्यासाठी १५ डिसेंबरची मुदत 

पुणे : रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी उत्पादकांना शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आत्तापर्यंत राज्यात सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ५५ लाख इतका होता. गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबरची मुदत असल्याने सहभागी शेतकरी अर्जांची संख्या वाढेल, अशी आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर विभागाने आघाडी घेतली असून या विभागात आतापर्यंत १ लाख ३६ हजार शेतकरी अर्ज संख्या आहे तर संभाजीनगर विभागात ७८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत.

केंद्र सरकारने रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा कांदा भात आणि उन्हाळी भुईमूग या सहा पिकांसाठी विमा योजना जाहीर केली आहे. ज्वारी पिकासाठी विमा उतरवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे सहभागासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर गहू हरभरा व कांदा पिकासाठी ही मुदत १५ डिसेंबर अशी आहे. उन्हाळी भात व भुईमूग पिकासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ अशी ठेवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ६५ हजार ११ शेतकऱ्यांनी ३ लाख २६ हजार १६८ अर्ज केले आहेत. या अर्जांनुसार २ लाख ६ हजार ९९५ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. गेल्या वर्षी या योजनेत २८ लाख ५३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी ५५ लाख १७ हजार ८१४ अर्ज आले होते.

रब्बी हंगामात सबंध राज्यभर गहू व हरभरा या दोन पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते तसेच ओलिताची सोय असलेल्या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे क्षेत्रही मोठे असते. या तिन्ही पिकांसाठी विमा योजनेत सहभागासाठीची अंतिम मुदत १५ डिसेंबर असल्याने पुढील दोन आठवड्यांत सहभागी शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या वाढेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 विभागनिहाय अर्ज संख्या

कोकण- ६

नाशिक- ७९४६

पुणे- ४३०२७

कोल्हापूर- १९६४९

संभाजीनगर- ७९३९९

लातूर- १३७००१

अमरावती- ३७४५२

नागपूर- १५१९

एकूण- ३२६१६८ 

फळपीक योजनेत २ लाख १३ हजार अर्ज

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत आंबिया बहार (रब्बी) मध्ये आतापर्यंत २ लाख १३ हजार ६५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी २ लाख ३५ हजार ७२५ अर्ज आले होते. काजू, संत्रा व आंबा (कोकण विभागासाठी) फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. आंबा पिकासाठी कोकण विभाग वगळून इतर जिल्ह्यांसाठी ३१ डिसेंबर व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Three Lakh Applications Received for Rabi Crop Insurance Scheme

Web Summary : Over three lakh applications received in Maharashtra for Rabi crop insurance. Farmers rush before deadlines for Jowar, Wheat, Gram, and Onion. Latur division leads in applications. Fruit crop insurance sees 2.13 lakh applications.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र