शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

एकाचे काढुन दुसऱ्याला देण्यात सरकारला रस नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:53 IST

- चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे.

पुणे: एकाच्या ताटातील काढुन घेऊन ते दुसऱ्याला द्यायचे असे करण्यात आमच्या सरकारला रस नाही, टिकणारे आरक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बावनकुळे मंगळवारी पुण्यात आले होते.

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी सरकार आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या आरोपांचा नकार केला. ते पुढे  म्हणाले, चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे. तोडगा मिळत नाही तोपर्यंत आंदोलकांशी चर्चा करणार तरी कशी? त्यांची मागणी सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी आरक्षण, तेही ओबीसी कोट्यातून अशी आहे. हे करता येणार नाही. घटनेची चौकट आहे. मग काय करता येईल यावर विचार करूनच आम्ही कुणबी नोंदी तपासण्याचा व ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागेच घेतला. त्याप्रमाणे कामही सुरू आहे. मराठवाड्यात अशी कितीतरी प्रमाणपत्र वितरीतही करण्यात आली.

ते काम थांबलेले नाही, सुरूच आहे हे आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवे असे बावनकुळे म्हणाले. आरक्षण द्यायचे तर किमान काही पुरावा असावा. ज्यांचे असे पुरावे मिळतात, त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिले जाते. पुरावेच नाहीत, त्यांना देता येणार नाही. घटनेच्या चौकटीबाहेर जाऊन काहीच करता येणार नाही. न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत काही आदेश दिले आहेत. त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. न्यायालयाने सरकारलाही आदेश दिलेत. त्याप्रमाणे सरकारने कारवाई सुरू केली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.सरकारमध्ये या आरक्षण विषयापासून उपमुख्यमंत्री अजित पवार अलिप्त दिसतात, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा हा प्रकार आहे का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. आमचे २३७ आमदार आहेत. ५१ टक्के मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. राज्यातील १४ कोटी जनतेची देवेंद्र फडणवीस सरकारला मान्यता आहे. तीनही पक्षांचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यांच्यात संवाद आहे. त्यांनी दररोज एकमेकांबरोबर बोललेच पाहिजेत असा आग्रह कशासाठी? न बोलताही ते काम करत आहेत असा दावा बावनकुळे यांनी केला. कसबा गणपतीबरोबरच शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे दर्शन.बावनकुळे यांनी घेतले. त्यांच्यासमवेत राजेश पांडे तसेच भारतीय जनता पक्षाचे अन्य संघटनात्मक पदाधिकारी होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षणChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे