शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रोच्चार ऐकविले अन् सोयाबीन उत्पादन वाढले;मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढण्याचा दावा अशास्त्रीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:02 IST

पंजाबराव कृषी विद्यापीठाने भूमिका जाहीर करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

पुणे : वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार स्वीकारताना सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढविण्याचा केलेला दावा पूर्णपणे अशास्त्रीय आहे. याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाने आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

हा पुरस्कार स्वीकारताना कांचन गडकरी यांनी केलेला ‘शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले, तर शेती भरघोस उत्पादन देते. आम्ही आमच्या धापेवाड्यातल्या शेतीत सोयाबीनला श्री सुक्त व मंत्रोच्चार ऐकविले. त्यामुळे उत्पादन वाढले’. हा दावा पूर्णपणे अशास्त्रीय असून, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. मंत्रोच्चारांमध्ये काही विशेष सामर्थ्य असते आणि ते ऐकून सोयाबीनचे झाड स्वत:चे उत्त्पन्न वाढवू शकते ही गोष्ट शास्त्राच्या प्राथमिक तपासणीवरदेखील टिकणारी नाही. सध्या वारी चालू असून, ज्ञानेश्वर महाराज यांनी बाराव्या शतकात ‘मंत्रेची वैरी मरे, तर का बांधावी कट्यारे? म्हणजेच मंत्राने शत्रू मरत असेल तर कट्यार काय कामाची ? असा रोकडा कार्यकारण भाव सांगणारा प्रश्न विचारला आहे. असे असताना एकविसाव्या शतकात मंत्राने सोयाबीनचे उत्पन्न वाढविण्याचे दावे करणे हे उलट्या पावलाचा प्रवास आहे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सोयाबीनचे शेतकरी गेली अनेक वर्षे शासनाच्या धोरणामुळे अडचणींत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनला शासनाने सांगितलेला हमीभाव न देता अशा स्वरूपाचे दैववादी उपचार सांगणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर ते केले जात असताना त्यांनी जर त्याचे खंडण केले नाही, तर शेतकऱ्यांना ते खरे वाटू शकतात म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि हा पुरस्कार देणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्र अंनिसमार्फत नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, रामभाऊ डोंगरे, प्रकाश घादगिने, सम्राट हटकर, मुक्ता दाभोलकर, अशोक कदम, मुंजाजी कांबळे, फारुख गवंडी, प्रवीण देशमुख यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड