शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

गुंजवणी धरणातील बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;राजगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:19 IST

याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.

वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने गेवंडे परिसरातील १० मुले शाळा सुरू झाल्यापासून गैरहजर असल्याने शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.

गुंजवणी धरणाग्रस्तांनी गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील रस्त्यासाठी आपल्या जमिनी मोबदला मिळण्याच्या अगोदर दिल्या आहेत कारण सर्व गावात रस्ता व्यवस्थित जाईल, या गावांना रस्त्यासाठी १२ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या रस्त्याची टेंडर झाले असून, चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली; पण रस्ता पूर्ण झाला नाही.

गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील विद्यार्थी निवी येथील माध्यमिक विद्यालय व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुंजवणी धरणातील बोटीचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी बोट सुरू होती. परंतु या वर्षी बोट सुरू नसल्याने अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १६ जूनपासून विद्यार्थी शाळेत जात नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत. संबंधित ठेकेदाराने बोट चालवून गावातील प्रवाशांची सोय करावी, अशी अट टेंडरमध्ये असूनदेखील संबंधित ठेकेदार बोट चालवित नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील नागरिकांनादेखील दळणवळणासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोटद्वारे शालेय विद्यार्थी व प्रकल्पग्रस्तांची वाहतूक करणे बंधनकारक आहे. असे निविदा प्रक्रियेमध्ये स्पष्ट केले आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोट सुरू केली नाही. तरी विद्यार्थी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ताबडतोब ती बोट सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुनीता खुटेकर यांनी केली आहे.

कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता ७ किलोमीटर रस्ता असून, त्यापैकी ४ किलोमीटर रस्त्याचे कच्चे काम झाले आहे. ठिकठिकाणी मोऱ्या टाकणे बाकी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता नाही, एप्रिलपर्यंत संबधित ठेकेदाराने गुंजवणी धरणात बोट चालवली होती मे महिन्यात पाणी नसल्याने बोट बंद केली. परंतु या वर्षी मे महिन्यात पाऊस चांगला झाला. विद्यार्थ्यांसाठी १६ जूनला बोट सुरू करणे आवश्यक होती. त्यामुळे येथील १० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.  - विकास कडू, माजी सरपंच, निवी गेवंडे ग्रामपंचायत

 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र