शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

गुंजवणी धरणातील बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;राजगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:19 IST

याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.

वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने गेवंडे परिसरातील १० मुले शाळा सुरू झाल्यापासून गैरहजर असल्याने शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.

गुंजवणी धरणाग्रस्तांनी गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील रस्त्यासाठी आपल्या जमिनी मोबदला मिळण्याच्या अगोदर दिल्या आहेत कारण सर्व गावात रस्ता व्यवस्थित जाईल, या गावांना रस्त्यासाठी १२ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या रस्त्याची टेंडर झाले असून, चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली; पण रस्ता पूर्ण झाला नाही.

गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील विद्यार्थी निवी येथील माध्यमिक विद्यालय व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुंजवणी धरणातील बोटीचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी बोट सुरू होती. परंतु या वर्षी बोट सुरू नसल्याने अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १६ जूनपासून विद्यार्थी शाळेत जात नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत. संबंधित ठेकेदाराने बोट चालवून गावातील प्रवाशांची सोय करावी, अशी अट टेंडरमध्ये असूनदेखील संबंधित ठेकेदार बोट चालवित नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील नागरिकांनादेखील दळणवळणासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोटद्वारे शालेय विद्यार्थी व प्रकल्पग्रस्तांची वाहतूक करणे बंधनकारक आहे. असे निविदा प्रक्रियेमध्ये स्पष्ट केले आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोट सुरू केली नाही. तरी विद्यार्थी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ताबडतोब ती बोट सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुनीता खुटेकर यांनी केली आहे.

कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता ७ किलोमीटर रस्ता असून, त्यापैकी ४ किलोमीटर रस्त्याचे कच्चे काम झाले आहे. ठिकठिकाणी मोऱ्या टाकणे बाकी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता नाही, एप्रिलपर्यंत संबधित ठेकेदाराने गुंजवणी धरणात बोट चालवली होती मे महिन्यात पाणी नसल्याने बोट बंद केली. परंतु या वर्षी मे महिन्यात पाऊस चांगला झाला. विद्यार्थ्यांसाठी १६ जूनला बोट सुरू करणे आवश्यक होती. त्यामुळे येथील १० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.  - विकास कडू, माजी सरपंच, निवी गेवंडे ग्रामपंचायत

 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र