शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पुरंदर विमानतळासाठी आता केवळ १२८५ हेक्टर क्षेत्र संपादित होणार, १३८८ हेक्टरची कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:02 IST

या प्रकल्पासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के जमीन परताव्यासह मोबदलाही देण्यात येणार

पुणे : प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर केले आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. आता गावनिहाय संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे क्षेत्र येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के जमीन परताव्यासह मोबदलाही देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारपासून (दि. २५) जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयात संमती स्वीकारण्यात येणार आहे. संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ मोबदला दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार, अशी घोषणा केली होती. त्यानुसार २४ एप्रिल रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली होती. यात १३ हजार ३०० शेतकरी बाधित होणार होते. त्यानंतर या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. योग्य मोबदला आणि पुनर्वसन करावे या मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के विकसित भूखंड आणि चार पट मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबरोबरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या शेतकऱ्यांना विविध फायदे देण्यात येतील, असे घोषित केले होते.

मात्र, महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे क्षेत्र कमी करण्याबाबत सुतोवाचही केले होते. तरीदेखील बाधित शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी शेती आणि घरांची व्यवस्था करण्यात येईल. शक्यतो हे पुनर्वसन आहे, त्याच ठिकाणी करण्याचा विचार आहे. बाधितांना योग्य तो मोबदला दिला जाईल, त्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हे क्षेत्र कमी करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मसुदा आराखडा, विमानक्षेत्राची सीमा दर्शविणारा सर्वेक्षण नकाशा व ओएलएस सर्वेक्षण नकाशे आदी दस्तावेज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विमान क्षेत्राची सीमा दर्शविणाऱ्या सर्वेक्षण नकाशानुसार दोन्ही ४-एफ धावपट्टीचा विचार करता साधारण १ हजार २८५ हेक्टर एवढ्या क्षेत्राचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू यांनी डुडी यांना दिले आहेत. त्यानुसार आता गावनिहाय क्षेत्र काढण्याचे काम सुरू आहे.

भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना चारपट मोबदल्यासह जमिनीचा परतावा देण्यात येणार आहे. यासाठी एरोसिटीत १० टक्के विकसित भूखंड दिला जाईल. संमती घेण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयासह सासवड येथील पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयातही या संमती स्वीकारण्यात येतील. मात्र, संमतीने देणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ चारपट मोबदलाच देेण्यात येईल.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड