शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘बालभारती’ची पुस्तके अशी बनवा की मुलांना मोबाइल नको वाटेल - शिक्षणमंत्री दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:05 IST

- मोबाइलवरील कार्टून दाखवल्याशिवाय जेवण जात नाही मुले मोबाइल बाजूला ठेवून आनंदाने पुस्तके वाचतील

पुणे : ‘आज मोबाइल, टीव्ही, ‘एआय’सारख्या आधुनिक माध्यमांच्या आकर्षणामुळे मुलांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीतील मूल्यांशी तुटत चालली आहे. अगदी अडीच-तीन वर्षांच्या मुलालाही जेवण करताना मोबाइलवरील कार्टून दाखवल्याशिवाय जेवण जात नाही. हीच स्थिती बदलायची आहे, अशी अपेक्षा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. तसेच बालभारतीने अशी पुस्तके निर्माण केली पाहिजे, की मुले मोबाइल बाजूला ठेवून ती आनंदाने वाचतील,’ असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २२) भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, ‘एनसीआरटी’चे संचालक राहुल रेखावार, बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक, सुकाणू समितीचे सदस्य श्रीपाद ढेकणे तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष, लेखक व शैक्षणिक तज्ज्ञ उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘आपले शिक्षण केवळ भाकरीपुरते मर्यादित न राहता ते राष्ट्रीय जबाबदारीचे असले पाहिजे. उद्याचा नागरिक हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकला पाहिजे, तसेच तो राष्ट्रहिताचा विचार करणारा घडला पाहिजे. यासाठी शाळेत असतानाच त्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणे ही शिक्षक-लेखकांची जबाबदारी आहे. नवीन पुस्तकाच्या माध्यमातून जीवन जगण्याची प्रेरणा पुढील पिढी घडवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक म्हणाल्या, ‘बालभारतीच्या दोन प्रमुख जबाबदाऱ्या म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन करणे या होत. आतापर्यंत बालभारतीने वेळोवेळी अभ्यासक्रमाच्या बदलांनुसार पुस्तके तयार केली आहेत. यावेळी मात्र मोठं आव्हान आहे. एका वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची चार पाठ्यपुस्तके बदलायची आहेत. हे काम आपण सगळ्यांनी एकत्रितपणे नीट पार पाडू, असा विश्वास आहे.

‘एनसीआरटी’चे संचालक राहुल रेखावार म्हणाले, ‘आतापर्यंत महाराष्ट्राने अनेक वेळा पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत; पण या वेळची पुस्तकं मात्र वेगळी असतील; कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार फक्त पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून, वेगवेगळ्या पातळ्यांवर शिकता यावं यावर भर आहे. त्यामुळे या वेळची पाठ्यपुस्तके नावीन्यपूर्ण असणे आवश्यक आहे.’

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षण