शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारी संकटात ? शरद पवारांचा इशारा म्हणाले,'गाळप क्षमतेवर नवे धोरण हवेच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:44 IST

- या खासगी कारखान्यांनी कामगारांची संख्यादेखील कमी केल्याने सहकार्य कारखाने त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत.

पुणे : दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागत आहे. खाजगी कारखान्यांचे प्रस्थ वाढत असून, ते पाहून अस्वस्थता वाढत आहे. कारखान्यांबाबत समस्या निर्माण झाल्यास चर्चा कुणाशी करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील खासगी कारखाने राज्याबाहेरील लोकांचे असल्याने त्यांना स्थानिकांशी आस्था नाही. त्यातच या कारखान्यांची गाळपक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कमी क्षमतेचे सहकारी कारखाने टिकणे अवघड झाले आहे. या खासगी कारखान्यांनी कामगारांची संख्यादेखील कमी केल्याने सहकार्य कारखाने त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राज्य सरकार यांच्यात चर्चा घडवून याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, किशोर पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, प्रतिष्ठानच्या सचिव वंदना पवार, अंकुश काकडे उपस्थित होते. पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात खासगी साखर कारखाने वाढत असून, तीच स्थिती आता महाराष्ट्रातही दिसत आहे. सहकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत. खासगी कारखान्यांमध्ये कमीतकमी कामगारांमध्ये काम करण्याची प्रथा सुरू झाली आहे. कारखाने टिकले पाहिजेत, मात्र, घाम गाळणाऱ्या कारखान्यात कामगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे काय, याचा विचार करावा लागेल. कारखान्याच्या गाळप क्षमतेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे कमी क्षमता असलेले सहकारी कारखाने पुढील टिकणार नाही. त्यासाठी राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत धोरण आखले पाहिजे.किशोर पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत पूर्वी साखर कामगार संघटना चर्चेसाठी आल्यानंतर कामगारांच्या पदरात जास्तीतजास्त पाडून घेण्याची त्यांची भूमिका असायची. मात्र, बैठकीनंतर कारखानदार संघटनेचे नेते यांच्यात सख्य असायचे. त्यांनी कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. सध्या मात्र, कामगारांची मानसिकता ‘संघर्ष नको’ अशी झाली आहे. यावर देखील विचार करण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.पूर्वी बहुतांश तरुण डाव्या विचारांचे असायचे. सध्या मात्र तरुणांच्या विचारांना शहकाटशहा दिला जात आहे त्यांच्यात धार्मिक ओढ जास्त दिसून येत असून, लोकशाहीचा विचार पुढे नेण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. आपण यात कमी पडत आहोत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ठाकूर यांनी किशोर पवार हे सीमा लढ्याचे शेवटचे आधार होते, असे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार