शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

Pune Crime : पुण्याच्या रस्त्यांवर गुंडांचा उन्माद; आमदार, खासदार कधी बोलणार ? पुणेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:16 IST

भर रस्त्यात मारहाण, गोळीबार, गँगवार आणि ताबेमारी अशा घटना सलग घडत असताना, या सगळ्यावर आमदार-खासदार गप्प का?

पुणे - कधीकाळी संस्कृतीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही दिवसांत गुंडांच्या दहशतीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भर रस्त्यात मारहाण, गोळीबार, गँगवार आणि ताबेमारी अशा घटना सलग घडत असताना, या सगळ्यावर आमदार-खासदार गप्प का? असा सवाल पुणेकरांना पडू लागला आहे.

गँगस्टर गजा मारणेच्या टोळीने तरुणाला मारहाण केली, निलेश घायवळच्या गुंडांनी भर चौकात गोळीबार केला, बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाचा गँगवारमधून खात्मा केला, तर टिपू पठाणच्या टोळीने खुलेआम  मारहाण केली. या घटनांवरून शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूत्रं स्वीकारल्यानंतर गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, टिपू पठाण यांसारख्या नामवंत गुंडांची ओळख परेड घेऊन खळबळ उडवून दिली होती. काही काळ गुंडांचा धाक बसल्याचा भास झाला, मात्र आता हेच गुंड पुन्हा मोकाट फिरताना दिसत आहेत.

गजा मारणेच्या गुंडांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण केली होती. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र वाद वाढल्याने कारवाई करावी लागली. तरीही आरोपी रुपेश मारणे मागील पाच महिन्यांपासून फरार असून पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

सप्टेंबरमध्ये आंदेकर टोळीने नऊ गोळ्या झाडून आयुष कोमकर या निष्पाप तरुणाचा जीव घेतला. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या घटनेबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती, मात्र तरीही रक्तपात रोखण्यात पोलीस अपयशी ठरले. दुसरीकडे २८ गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला टिपू पठाण बेधडक वावरत होता. त्याचे पैसे उधळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

निलेश घायवळ टोळीने नुकताच कोथरूडमध्ये गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून दहशत माजवली. ही घटना पोलीस ठाण्याच्या जवळ घडली, तरी घटनास्थळी पोलीस पोहोचायला अर्धा तास लागला. त्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि धाक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

पूर्वी गँगवॉर फक्त टोळ्यांपुरता मर्यादित होता. मात्र आता सर्वसामान्य पुणेकरांनाही याचा फटका बसू लागला आहे. वाहनं फोडली जात आहेत, तरुणांना रस्त्यावरच बेदम मारहाण केली जात आहे, आणि नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

यातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, पुण्याचे अनेक राजकारणी या घटनांकडे डोळेझाक करत आहेत. काही नेते गुंडांच्या व्यासपीठावर दिसलेही आहेत. त्यामुळे राजकीय पाठबळामुळेच गुंडांचा दादागिरीखोरपणा वाढत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी