शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:54 IST

नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले असून, ८२ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

पुणे - नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले असून, ८२ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत. यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या; मात्र ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई–बंगळुरू असा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता आणि नऱ्हे येथील महामार्गावर गेलेले आहेत. गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.

महामार्गावर अपघात घडला की, अनेकवेळा वाहनचालकांची चूक, ब्रेक फेल होणे किंवा अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशी कारणे समोर येतात. मात्र या अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे या परिसरातील तीव्र उतार. तो उतार कमी करणे हाच त्यावरचा पर्याय आहे किंवा लवकरात लवकर रिंगरोड तयार करून अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा

दरम्यान, पुण्यातील अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' पोस्ट करुन त्यांनी घोषणा केली. "पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल", असंही ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nawale Bridge Accidents: How Many More Innocent Lives Will Be Lost?

Web Summary : Accidents plague Pune's Nawale Bridge, claiming 82 lives in eight years. Locals demand permanent solutions to the steep slope, like a ring road, as temporary fixes fail. The administration's inaction angers residents.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात