शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Pune: घरावर काळ्या गुढ्या उभारून पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 20:13 IST

शासनाने जाहीर केलेल्या वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजूवडी आणि खानवडी या सात गावांतील तब्बल २८३२ हेक्टर जमिनीचे विमानतळ प्रकल्पासाठी संपादन करण्यात येणार आहे...

सासवड (पुणे) :पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजुवडी आणि खानवडी या सात गावांमध्ये राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा घाट घातला आहे, तर कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ द्यायचा नाही यासाठी सात गावांतील ग्रामस्थांनी चंग बांधला आहे. विशेष म्हणजे इकडे ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध वाढत असताना सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसून येत आहे. तब्बल सात वर्षे स्थानिक नागरिकांशी कोणतीही चर्चा न करता किंवा शेतकऱ्यांचे म्हणणे न ऐकून घेता परस्पर घोषणा करीत असल्याने याचा निषेध म्हणून सात गावांतील नागरिकांनी आपल्या घरावर काळ्या गुढ्या उभारून सरकारचा आणि प्रकल्पाचा जाहीर निषेध नोंदविला आहे.

शासनाने जाहीर केलेल्या वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजूवडी आणि खानवडी या सात गावांतील तब्बल २८३२ हेक्टर जमिनीचे विमानतळ प्रकल्पासाठी संपादन करण्यात येणार आहे, एवढी मोठ्या प्रमाणात भूसंपादन होत असल्याने सातही गावे प्रकल्पबाधित होणार असून, नागरिकांना आपापली गावे सोडून अन्यत्र कायमस्वरूपी जावे लागणार आहे. साहजिकच नागरिकांच्या मनात मोठी धाकधूक वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून या गावच्या नागरिकांनी आपला जोरदार विरोध दर्शविला आहे. आम्हाला प्रकल्पासाठी निर्वासित व्हावे लागत असेल तर प्रकल्प नको अशी भूमिका घेतली आहे. मात्र, तरीही नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता किंवा चर्चा न करता विविध घोषणा थेट भूसंपादनाची तयारी करीत आहे.

वनपुरी येथे माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरावर काळ्या गुढ्या उभारून प्रकल्पाचा निषेध नोंदविण्यात आला. लंकेश महामुनी, शिवाजी कुंभारकर, माणिकराव कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर, शंकर कुंभारकर, अन्नासो कुंभारकर, शरद कुंभारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मागील महिन्यात पारगाव येथे सातही गावांतील नागरिकांनी पुन्हा एकदा जाहीर विरोध व्यक्त केला होता, तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त घरावर काळ्या गुढ्या उभारून निषेध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रकल्पग्रस्त सातही गावांतील नागरिकांनी घरावर काळ्या गुढ्या उभारून निषेध व्यक्त केला, तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार केला.

आमच्यासाठी विमानतळ प्रकल्प उभारणार आणि आम्हालाच गावे सोडून जावे लागत असेल, तर प्रकल्प नक्की कोणासाठी? पिढ्यान्पिढ्या आमचा या मातीशी संबंध आहे. शेतकऱ्यांनी या भागात अंजीर, डाळिंब, पेरू, सीताफळ यांच्या बागा लावल्या आहेत, पुरंदर उपसा योजनेतून प्रत्येक शेतात पाणी पोहोचले आहे. बहुतेक क्षेत्र बागायती असून, आम्ही आमच्या गावात सुखी आहोत. उसाचे क्षेत्र वाढले असून आम्हाला साखर कारखाना द्या, अशी मागणी करतानाच कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार वनपुरी गावचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळ