शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

जिल्हा प्रशासनातर्फे चा-यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 17:56 IST

दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत मारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजनकोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश

पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या चा-याचे नियोजन करण्यात आले असून चा-यासाठी राज्य शासनाला १०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जानेवारीपासून जूनपर्यंत अडीच मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.त्यामुळे दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चारा नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यात संबंधित अधिका-यांना चारा उपलब्धतेबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पाणी नसलेल्या जलाशयाच्या किती एकर जमिनीमध्ये चारा पिके घेता येतील.याबाबतची माहिती येत्या सात दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.  नवल किशोर राम म्हणाले, जिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत पुरतो. जानेवारी महिन्यानंतरच्या चा-यासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून जूनपर्यंतच्या चा-याचे नियोजन काण्यात आले असून सुमारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजन केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलाशयातील पाणी संपले आहे.त्यामुळे कोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दुष्काळी परिस्थितीत गाळपेरा किंवा इतर भागात केवळ चारा पिके घेतेली जाणार असून शेतक-यांंना आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यासंदर्भात संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNavalkishor Ramनवलकिशोर रामState Governmentराज्य सरकारdroughtदुष्काळ