शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीतून सावरतानाच पिकांना हवामानाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:59 IST

शेतकरी पुन्हा संकटात...

ठळक मुद्देपिकांवर पुन्हा अस्मानी : कांद्यावर करपा, तर उसाला आले तुरे मागास कांद्याची वाढ खुंटून पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा विपरीत परिणाम महागडी रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर  ढगाळ वातावरण पिकांच्या वाढीसाठी निश्चितच धोकादायकगेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल

पुणे (शेलपिंपळगाव) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यातून सावरत असतानाच गेल्या आठवड्याभरापासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर करपा, बुरशी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पिके वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारावी लागत आहे. यामुळे उत्पादनखर्च तरी मिळणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील मागास कांदा, गहू, मका, कोबी, फ्लॉवर, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर विशेषत: मिरची, गवार, वांगी, वालवर पिकांवर मावा व करपा रोगराईचे सावट पसरले आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही ही प्रमुख हंगामात शेतकºयांना दूषित हवामानाशी सामना करावा लागला. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदा पिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालवधीत हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी कांदा उत्पादनात कमालीची घट घडून येत आहे. खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान कालव्याचे मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने बळीराजा खरीप व रब्बी या मुख्य दोन हंगामासह उन्हाळी हंगामात देखील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेषत: या हंगामात मागास कांदा, वाल, मका, फुलझाडे, बाजरी, पालेभाज्या, तोडीव पिके तसेच फळपिके पिकवण्याकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. रब्बीतील मागास कांद्याची वाढ खुंटून पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आगाप कांदालागवडीला ज्या लहरी हवामानाने बाधित केले होते, त्याच प्रकारे मागास कांद्याच्याही संवर्धनासाठी महागडी रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.......... रब्बी हंगामात हवामान बदलाचा प्रभाव आणि परिणाम जाणवत आहे. पुढील आठ दिवस थंडीतही चढ-उतार होणार आहे. गहू आणि कांदा पिकाला पाणी, खते आणि औषधांचे योग्य नियोजन केल्यास पीक यशस्वीपणे काढता येईल. तुरा आलेले ऊस पीक गाळपाला येणे योग्य राहील. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ.......... ढगाळ वातावरण पिकांच्या वाढीसाठी निश्चितच धोकादायक ठरत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने पिकांवर रोगराई पसरू लागली आहे. आगाप कांद्याच्या उत्पादनात किमान ५० टक्के घट झाली आहे.- विलास मोहिते, शेतकरी मोहितेवाडी........खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. चालू वर्षी सुरुवातीच्या आगाप कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त झाल्याने अनेक शेतकरी मागास कांद्याकडे आकर्षित झाले आहेत. सध्या प्रतीनुसार कांद्याला प्रतिकिलो ३५ ते ४० रु. भाव मिळत आहे. हवामानाची साथ मिळत नसल्याने मागास कांदालागवडी धोक्यात येऊ लागल्या आहेत.  दूषित हवामानामुळे मका, मागास गहू, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर आदी महत्त्वाच्या सर्वच पिकांवर करपा, मावा, पीळ, चिकटा, अळी आदी रोगांचा अधिक प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या सोबतच जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागाही ढगाळ वातावरणमुळे संकटात आल्या आहेत. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिल्यास ही पिके पूर्णत्वास येण्यास अडचण येणार असल्याचे उत्पादक शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrop Loanपीक कर्जCrop Insuranceपीक विमाGovernmentसरकारFarmerशेतकरीRainपाऊस